Translate

Thursday, March 30, 2023

देव देव्हाऱ्यात नाही

 

देव देव्हाऱ्यात नाही

संकलंकर्ता विवेकानंद पाटील 8600549450

देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी

देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई

देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी
देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी

देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे
देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे
तुझ्या-माझ्या जड देही देव भरूनिया राही


देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत
देव सगुण, निर्गूण, देव विश्वाचे कारण
काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही

Monday, August 5, 2019

💎 वाटनी 💎 (नव्हे तर तूकडे आई च्या काळजाचे)

डोळ्यांत पाणी येईल अशी एक सुंदर कविता...

⚡  वाटणी ⚡
              |
      🎅  | 🎅

दोन सख्खे भाऊ
पक्के वैरी झाले
बघता बघता ते आता
वाटणीवर आले
💠💠💠
बारा खणाचा वाडा
६-६खणांची वाटणी केली
दोघांच्या मध्ये एक
 भावकीची भिंत आली
💠💠💠
घराची एकही वीट
विधवा आईच्या वाट्याला नाही आली
त्यांनी १२ खणासमोरच तीच्यासाठी झोपडी तयार केली
💠💠💠
भांडीकुंडी जमिनजुमल्याची
झाली समान वाटणी
विषय राहीला फक्त
विधवा आईला कोण देणार
भाकर आणि चटणी
💠💠💠
८-८दिवसांनी द्यायची
ठरले एक-एकाने
आईसाठी भाकरी
पण भाकरीच्या बदल्यात तीने करायची त्याच्याच घरी चाकरी
💠💠💠
दिवाळी सणासाठीही तीला कोणी नवी साडी नाही दिली
मग तिनेच दोन लुगड्यांची
 नवी चिंधी तयार केली
💠💠💠
भाकरतुकड्या वाचून आईचे
होऊ लागले हाल
दोघेही म्हणतात "आमचा
आठवडा संपलाय काल"
💠💠💠
शेवटी एकाने दिले मीठ
एकाने दिले पीठ
आईला अशा
भिका-यावाणी जगण्याचा
आला आता खूप वीट
💠💠💠
बिचारी आई अन्नाविना
तशीच झोपी गेली
दोन दोन वंशाचे दिवे
पण कोणालाच तीची
 दया नाही आली
💠💠💠
झोपेतच मारली तीने
मग मरणाला मिठी
मरणानंतरही जुंपले भांडण मयतीच्या खर्चासाठी
💠💠💠
शेवटी गावक-यांनी तीला
अग्नीडाव दिला
दोन वंशाचे दिवे पण
 शेवटीही एक कामी नाही आला
💠💠💠
असे जगता जगता
 नातूही झाले मोठे
त्यांनाही प्रश्न पडला
आईबापाला ठेवावे कोठे?
💠💠💠
त्यांनीही आईबापाला
आजीच्याच झोपडीत ठेवले
केलेल्या पापाचे फळ
त्यांना याच जन्मी दिले
💠💠💠
जैसी करणी वैसी भरणी
ही रितच खरी आहे
थोडा धीर धर मित्रा
घोडामैदान जवळच आहे
🔲🔲🔲🔲🔲🔲
"कर्म" एक असं बुफे रेस्टॉरेंट आहे
जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही...
तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण  शिजवलेलं असतं
🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌿🌿🌿 शिवसहस्रनाम 🌿🌿🌿

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

                *शिव सहस्त्रनाम स्तोत्रं*

*ॐ स्थिराय नमः॥ॐ स्थाणवे नमः॥ॐ प्रभवे नमः॥ॐ भीमाय नमः॥ॐ प्रवराय नमः॥ॐ वरदाय नमः॥ॐ वराय नमः॥ॐ सर्वात्मन नमः॥ ॐ सर्वविख्याताय नमः॥ ॐ सर्वस्मै नमः॥ ॐ सर्वकाराय नमः॥ॐ भवाय नमः॥ॐ जटिने नमः॥ॐ चर्मिणे नमः॥ ॐ शिखण्डिने नमः॥ ॐ सर्वांङ्गाय नमः॥ ॐ सर्वभावाय नमः॥ ॐ हराय नमः॥ ॐ हरिणाक्षाय नमः॥ ॐ सर्वभूतहराय नमः॥ ॐ प्रभवे नमः॥ ॐ प्रवृत्तये नमः॥ ॐ निवृत्तये नमः॥ ॐ नियताय नमः॥ ॐ शाश्वताय नमः॥ ॐ ध्रुवाय नमः॥ ॐ श्मशानवासिने नमः॥ ॐ भगवते नमः॥ ॐ खेचराय नमः॥ ॐ गोचराय नमः॥ ॐ अर्दनाय नमः॥ ॐ अभिवाद्याय नमः॥ ॐ महाकर्मणे नमः॥ ॐ तपस्विने नमः॥ ॐ भूतभावनाय नमः॥ ॐ उन्मत्तवेषप्रच्छन्नाय नमः॥ ॐ सर्वलोकप्रजापतये नमः॥ ॐ महारूपाय नमः॥ ॐ महाकायाय नमः॥ ॐ वृषरूपाय नमः॥ ॐ महायशसे नमः॥ ॐ महात्मने नमः॥ ॐ सर्वभूतात्मने नमः॥ ॐ विश्वरूपाय नमः॥ ॐ महाहनवे नमः॥ ॐ लोकपालाय नमः॥ ॐ अंतर्हितात्मने नमः॥ ॐ प्रसादाय नमः॥ ॐ हयगर्दभाय नमः॥ ॐ पवित्राय नमः॥*

*ॐ महते नमः॥ ॐ नियमाय नमः॥ ॐ नियमाश्रिताय नमः॥ ॐ सर्वकर्मणे नमः॥ ॐ स्वयंभूताय नमः॥ ॐ आदये नमः॥ ॐ आदिकराय नमः॥ ॐ निधये नमः॥ ॐ सहस्राक्षाय नमः॥ ॐ विशालाक्षाय नमः॥ ॐ सोमाय नमः॥ ॐ नक्षत्रसाधकाय नमः॥ ॐ चंद्राय नमः॥ ॐ सूर्याय नमः॥ ॐ शनये नमः॥ ॐ केतवे नमः॥ ॐ ग्रहाय नमः॥ ॐ ग्रहपतये नमः॥ ॐ वराय नमः॥ ॐ अत्रये नमः॥ ॐ अत्र्यानमस्कर्त्रे नमः॥ ॐ मृगबाणार्पणाय नमः॥ ॐ अनघाय नमः॥ ॐ महातपसे नमः॥ ॐ घोरतपसे नमः॥ ॐ अदीनाय नमः॥ ॐ दीनसाधककराय नमः॥ ॐ संवत्सरकराय नमः॥ ॐ मंत्राय नमः॥ ॐ प्रमाणाय नमः॥ ॐ परमन्तपाय नमः॥ ॐ योगिने नमः॥ ॐ योज्याय नमः॥ ॐ महाबीजाय नमः॥ ॐ महारेतसे नमः॥ ॐ महाबलाय नमः॥ ॐ सुवर्णरेतसे नमः॥ ॐ सर्वज्ञाय नमः॥ ॐ सुबीजाय नमः॥ ॐ बीजवाहनाय नमः॥ ॐ दशबाहवे नमः॥ ॐ अनिमिषाय नमः॥ ॐ नीलकण्ठाय नमः॥ ॐ उमापतये नमः॥ ॐ विश्वरूपाय नमः॥ ॐ स्वयंश्रेष्ठाय नमः॥ ॐ बलवीराय नमः॥ ॐ अबलोगणाय नमः॥ ॐ गणकर्त्रे नमः॥ ॐ गणपतये नमः॥*

*ॐ दिग्वाससे नमः॥ ॐ कामाय नमः॥ ॐ मंत्रविदे नमः॥ ॐ परममन्त्राय नमः॥ ॐ सर्वभावकराय नमः॥ ॐ हराय नमः॥ ॐ *कमण्डलुधराय नमः॥ ॐ धन्विते नमः॥ ॐ बाणहस्ताय नमः॥ ॐ कपालवते नमः॥ ॐ अशनिने नमः॥ ॐ शतघ्निने नमः॥ ॐ खड्गिने नमः॥ ॐ पट्टिशिने नमः॥ ॐ *आयुधिने नमः॥ ॐ महते नमः॥ ॐ स्रुवहस्ताय नमः॥ ॐ सुरूपाय नमः॥ ॐ तेजसे नमः॥ ॐ तेजस्करनिधये नमः॥ ॐ उष्णीषिणे नमः॥ ॐ *सुवक्त्राय नमः॥ ॐ उदग्राय नमः॥ ॐ विनताय नमः॥ ॐ दीर्घाय नमः॥ ॐ हरिकेशाय नमः॥ ॐ सुतीर्थाय नमः॥ ॐ कृष्णाय नमः॥ ॐ श्रृगालरूपाय नमः॥ ॐ सिद्धार्थाय नमः॥ ॐ मुण्डाय नमः॥ ॐ सर्वशुभंकराय नमः॥ ॐ अजाय नमः॥ ॐ बहुरूपाय नमः॥ ॐ गन्धधारिणे नमः॥ ॐ कपर्दिने नमः॥ ॐ उर्ध्वरेतसे नमः॥ ॐ उर्ध्वलिंगाय नमः॥ ॐ उर्ध्वशायिने नमः॥ ॐ नभस्थलाय नमः॥ ॐ *त्रिजटाय नमः॥ ॐ चीरवाससे नमः॥ ॐ रूद्राय नमः॥ ॐ सेनापतये नमः॥ ॐ विभवे नमः॥ ॐ अहश्चराय नमः॥ ॐ नक्तंचराय नमः॥ ॐ तिग्ममन्यवे नमः॥ ॐ सुवर्चसाय नमः॥ ॐ गजघ्ने नमः॥*

*ॐ दैत्यघ्ने नमः॥ ॐ कालाय नमः॥ ॐ लोकधात्रे नमः॥ ॐ गुणाकराय नमः॥ ॐ सिंहसार्दूलरूपाय नमः॥ ॐ आर्द्रचर्माम्बराय नमः॥ ॐ कालयोगिने नमः॥ ॐ महानादाय नमः॥ ॐ सर्वकामाय नमः॥ ॐ चतुष्पथाय नमः॥ ॐ निशाचराय नमः॥ ॐ प्रेतचारिणे नमः॥ ॐ भूतचारिणे नमः॥ ॐ महेश्वराय नमः॥ ॐ बहुभूताय नमः॥ ॐ बहुधराय नमः॥ ॐ स्वर्भानवे नमः॥ ॐ अमिताय नमः॥ ॐ गतये नमः॥ ॐ नृत्यप्रियाय नमः॥ ॐ नृत्यनर्ताय नमः॥ ॐ नर्तकाय नमः॥ ॐ सर्वलालसाय नमः॥ ॐ घोराय नमः॥ ॐ महातपसे नमः॥ ॐ पाशाय नमः॥ ॐ नित्याय नमः॥ ॐ गिरिरूहाय नमः॥ ॐ नभसे नमः॥ ॐ सहस्रहस्ताय नमः॥ ॐ विजयाय नमः॥ ॐ व्यवसायाय नमः॥ ॐ अतन्द्रियाय नमः॥ ॐ अधर्षणाय नमः॥ ॐ धर्षणात्मने नमः॥ ॐ यज्ञघ्ने नमः॥ ॐ कामनाशकाय नमः॥ ॐ दक्षयागापहारिणे नमः॥ ॐ सुसहाय नमः॥ ॐ मध्यमाय नमः॥ ॐ तेजोपहारिणे नमः॥ ॐ बलघ्ने नमः॥ ॐ मुदिताय नमः॥ ॐ अर्थाय नमः॥ ॐ अजिताय नमः॥ ॐ अवराय नमः॥ ॐ गम्भीरघोषाय नमः॥ ॐ गम्भीराय नमः॥ ॐ गंभीरबलवाहनाय नमः॥ ॐ न्यग्रोधरूपाय नमः॥*

*ॐ न्यग्रोधाय नमः॥ ॐ वृक्षकर्णस्थितये नमः॥ ॐ विभवे नमः॥ ॐ सुतीक्ष्णदशनाय नमः॥ ॐ महाकायाय नमः॥ ॐ महाननाय नमः॥ ॐ विश्वकसेनाय नमः॥ ॐ हरये नमः॥ ॐ यज्ञाय नमः॥ ॐ संयुगापीडवाहनाय नमः॥ ॐ तीक्ष्णतापाय नमः॥ ॐ हर्यश्वाय नमः॥ ॐ सहायाय नमः॥ ॐ कर्मकालविदे नमः॥ ॐ विष्णुप्रसादिताय नमः॥ ॐ यज्ञाय नमः॥ ॐ समुद्राय नमः॥ ॐ वडमुखाय नमः॥ ॐ हुताशनसहायाय नमः॥ ॐ प्रशान्तात्मने नमः॥ ॐ हुताशनाय नमः॥ ॐ उग्रतेजसे नमः॥ ॐ महातेजसे नमः॥ ॐ जन्याय नमः॥ ॐ विजयकालविदे नमः॥ ॐ ज्योतिषामयनाय नमः॥ ॐ सिद्धये नमः॥ ॐ सर्वविग्रहाय नमः॥ ॐ शिखिने नमः॥ ॐ मुण्डिने नमः॥ ॐ जटिने नमः॥ ॐ ज्वालिने नमः॥ ॐ मूर्तिजाय नमः॥ ॐ मूर्ध्दगाय नमः॥ ॐ बलिने नमः॥ ॐ वेणविने नमः॥ ॐ पणविने नमः॥ ॐ तालिने नमः॥ ॐ खलिने नमः॥ ॐ कालकंटकाय नमः॥ ॐ नक्षत्रविग्रहमतये नमः॥ ॐ गुणबुद्धये नमः॥ ॐ लयाय नमः॥ ॐ अगमाय नमः॥ ॐ प्रजापतये नमः॥ ॐ विश्वबाहवे नमः॥ ॐ विभागाय नमः॥ ॐ सर्वगाय नमः॥ ॐ अमुखाय नमः॥ ॐ विमोचनाय नमः॥*

*ॐ सुसरणाय नमः॥ ॐ हिरण्यकवचोद्भाय नमः॥ ॐ मेढ्रजाय नमः॥ ॐ बलचारिणे नमः॥ ॐ महीचारिणे नमः॥ ॐ स्रुत्याय नमः॥ ॐ सर्वतूर्यनिनादिने नमः॥ ॐ सर्वतोद्यपरिग्रहाय नमः॥ ॐ व्यालरूपाय नमः॥ ॐ गुहावासिने नमः॥ ॐ गुहाय नमः॥ ॐ मालिने नमः॥ ॐ तरंगविदे नमः॥ ॐ त्रिदशाय नमः॥ ॐ त्रिकालधृगे नमः॥ ॐ कर्मसर्वबन्ध–विमोचनाय नमः॥ ॐ असुरेन्द्राणां बन्धनाय नमः॥ ॐ युधि शत्रुवानाशिने नमः॥ ॐ सांख्यप्रसादाय नमः॥ ॐ दुर्वाससे नमः॥ ॐ सर्वसाधुनिषेविताय नमः॥ ॐ प्रस्कन्दनाय नमः॥ ॐ विभागज्ञाय नमः॥ ॐ अतुल्याय नमः॥ ॐ यज्ञविभागविदे नमः॥ ॐ सर्वचारिणे नमः॥ ॐ सर्ववासाय नमः॥ ॐ दुर्वाससे नमः॥ ॐ वासवाय नमः॥ ॐ अमराय नमः॥ ॐ हैमाय नमः॥ ॐ हेमकराय नमः॥ ॐ अयज्ञसर्वधारिणे नमः॥ ॐ धरोत्तमाय नमः॥ ॐ लोहिताक्षाय नमः॥ ॐ महाक्षाय नमः॥ ॐ विजयाक्षाय नमः॥ ॐ विशारदाय नमः॥ ॐ संग्रहाय नमः॥ ॐ निग्रहाय नमः॥ ॐ कर्त्रे नमः॥ ॐ सर्पचीरनिवसनाय नमः॥ ॐ मुख्याय नमः॥ ॐ अमुख्याय नमः॥ ॐ देहाय नमः॥ ॐ काहलये नमः॥ ॐ सर्वकामदाय नमः॥ ॐ सर्वकालप्रसादाय नमः॥ ॐ सुबलाय नमः॥ ॐ बलरूपधृगे नमः॥*

*ॐ सर्वकामवराय नमः॥ ॐ सर्वदाय नमः॥ ॐ सर्वतोमुखाय नमः॥ ॐ आकाशनिर्विरूपाय नमः॥ ॐ निपातिने नमः॥ ॐ अवशाय नमः॥ ॐ खगाय नमः॥ ॐ रौद्ररूपाय नमः॥ ॐ अंशवे नमः॥ ॐ आदित्याय नमः॥ ॐ बहुरश्मये नमः॥ ॐ सुवर्चसिने नमः॥ ॐ वसुवेगाय नमः॥ ॐ महावेगाय नमः॥ ॐ मनोवेगाय नमः॥ ॐ निशाचराय नमः॥ ॐ सर्ववासिने नमः॥ ॐ श्रियावासिने नमः॥ ॐ उपदेशकराय नमः॥ ॐ अकराय नमः॥ ॐ मुनये नमः॥ ॐ आत्मनिरालोकाय नमः॥ ॐ संभग्नाय नमः॥ ॐ सहस्रदाय नमः॥ ॐ पक्षिणे नमः॥ ॐ पक्षरूपाय नमः॥ ॐ अतिदीप्ताय नमः॥ ॐ विशाम्पतये नमः॥ ॐ उन्मादाय नमः॥ ॐ मदनाय नमः॥ ॐ कामाय नमः॥ ॐ अश्वत्थाय नमः॥ ॐ अर्थकराय नमः॥ ॐ यशसे नमः॥ ॐ वामदेवाय नमः॥ ॐ वामाय नमः॥ ॐ प्राचे नमः॥ ॐ दक्षिणाय नमः॥ ॐ वामनाय नमः॥ ॐ सिद्धयोगिने नमः॥ ॐ महर्षये नमः॥ ॐ सिद्धार्थाय नमः॥ ॐ सिद्धसाधकाय नमः॥ ॐ भिक्षवे नमः॥ ॐ भिक्षुरूपाय नमः॥ ॐ विपणाय नमः॥ ॐ मृदवे नमः॥ ॐ अव्ययाय नमः॥ ॐ महासेनाय नमः॥ ॐ विशाखाय नमः॥*

*ॐ षष्टिभागाय नमः॥ ॐ गवाम्पतये नमः॥ ॐ वज्रहस्ताय नमः॥ ॐ विष्कम्भिने नमः॥ ॐ चमुस्तंभनाय नमः॥ ॐ वृत्तावृत्तकराय नमः॥ ॐ तालाय नमः॥ ॐ मधवे नमः॥ ॐ मधुकलोचनाय नमः॥ ॐ वाचस्पतये नमः॥ ॐ वाजसनाय नमः॥ ॐ नित्यमाश्रमपूजिताय नमः॥ ॐ ब्रह्मचारिणे नमः॥ ॐ लोकचारिणे नमः॥ ॐ सर्वचारिणे नमः॥ ॐ विचारविदे नमः॥ ॐ ईशानाय नमः॥ ॐ ईश्वराय नमः॥ ॐ कालाय नमः॥ ॐ निशाचारिणे नमः॥ ॐ पिनाकधृगे नमः॥ ॐ निमितस्थाय नमः॥ ॐ निमित्ताय नमः॥ ॐ नन्दये नमः॥ ॐ नन्दिकराय नमः॥ ॐ हरये नमः॥ ॐ नन्दीश्वराय नमः॥ ॐ नन्दिने नमः॥ ॐ नन्दनाय नमः॥ ॐ नंन्दीवर्धनाय नमः॥ ॐ भगहारिणे नमः॥ ॐ निहन्त्रे नमः॥ ॐ कालाय नमः॥ ॐ ब्रह्मणे नमः॥ ॐ पितामहाय नमः॥ ॐ चतुर्मुखाय नमः॥ ॐ महालिंगाय नमः॥ ॐ चारूलिंगाय नमः॥ ॐ लिंगाध्यक्षाय नमः॥ ॐ सुराध्यक्षाय नमः॥ ॐ योगाध्यक्षाय नमः॥ ॐ युगावहाय नमः॥ ॐ बीजाध्यक्षाय नमः॥ ॐ बीजकर्त्रे नमः॥ ॐ अध्यात्मानुगताय नमः॥ ॐ बलाय नमः॥ ॐ इतिहासाय नमः॥ ॐ सकल्पाय नमः॥ ॐ गौतमाय नमः॥ ॐ निशाकराय नमः॥*

*ॐ दम्भाय नमः॥ ॐ अदम्भाय नमः॥ ॐ वैदम्भाय नमः॥ ॐ वश्याय नमः॥ ॐ वशकराय नमः॥ ॐ कलये नमः॥ ॐ लोककर्त्रे नमः॥ ॐ पशुपतये नमः॥ ॐ महाकर्त्रे नमः॥ ॐ अनौषधाय नमः॥ ॐ अक्षराय नमः॥ ॐ परब्रह्मणे नमः॥ ॐ बलवते नमः॥ ॐ शक्राय नमः॥ ॐ नीतये नमः॥ ॐ अनीतये नमः॥ ॐ शुद्धात्मने नमः॥ ॐ मान्याय नमः॥ ॐ शुद्धाय नमः॥ ॐ गतागताय नमः॥ ॐ बहुप्रसादाय नमः॥ ॐ सुस्पप्नाय नमः॥ ॐ दर्पणाय नमः॥ ॐ अमित्रजिते नमः॥ ॐ वेदकराय नमः॥ ॐ मंत्रकराय नमः॥ ॐ विदुषे नमः॥ ॐ समरमर्दनाय नमः॥ ॐ महामेघनिवासिने नमः॥ ॐ महाघोराय नमः॥ ॐ वशिने नमः॥ ॐ कराय नमः॥ ॐ अग्निज्वालाय नमः॥ ॐ महाज्वालाय नमः॥ ॐ अतिधूम्राय नमः॥ ॐ हुताय नमः॥ ॐ हविषे नमः॥ ॐ वृषणाय नमः॥ ॐ शंकराय नमः॥ ॐ नित्यंवर्चस्विने नमः॥ ॐ धूमकेताय नमः॥ ॐ नीलाय नमः॥ ॐ अंगलुब्धाय नमः॥ ॐ शोभनाय नमः॥ ॐ निरवग्रहाय नमः॥ ॐ स्वस्तिदायकाय नमः॥ ॐ स्वस्तिभावाय नमः॥ ॐ भागिने नमः॥ ॐ भागकराय नमः॥ ॐ लघवे नमः॥*

*ॐ दम्भाय नमः॥ ॐ अदम्भाय नमः॥ ॐ वैदम्भाय नमः॥ ॐ वश्याय नमः॥ ॐ वशकराय नमः॥ ॐ कलये नमः॥ ॐ लोककर्त्रे नमः॥ ॐ पशुपतये नमः॥ ॐ महाकर्त्रे नमः॥ ॐ अनौषधाय नमः॥ ॐ अक्षराय नमः॥ ॐ परब्रह्मणे नमः॥ ॐ बलवते नमः॥ ॐ शक्राय नमः॥ ॐ नीतये नमः॥ ॐ अनीतये नमः॥ ॐ शुद्धात्मने नमः॥ ॐ मान्याय नमः॥ ॐ शुद्धाय नमः॥ ॐ गतागताय नमः॥ ॐ बहुप्रसादाय नमः॥ ॐ सुस्पप्नाय नमः॥ ॐ दर्पणाय नमः॥ ॐ अमित्रजिते नमः॥ ॐ वेदकराय नमः॥ ॐ मंत्रकराय नमः॥ ॐ विदुषे नमः॥ ॐ समरमर्दनाय नमः॥ ॐ महामेघनिवासिने नमः॥ ॐ महाघोराय नमः॥ ॐ वशिने नमः॥ ॐ कराय नमः॥ ॐ अग्निज्वालाय नमः॥ ॐ महाज्वालाय नमः॥ ॐ अतिधूम्राय नमः॥ ॐ हुताय नमः॥ ॐ हविषे नमः॥ ॐ वृषणाय नमः॥ ॐ शंकराय नमः॥ ॐ नित्यंवर्चस्विने नमः॥ ॐ धूमकेताय नमः॥ ॐ नीलाय नमः॥ ॐ अंगलुब्धाय नमः॥ ॐ शोभनाय नमः॥ ॐ निरवग्रहाय नमः॥ ॐ स्वस्तिदायकाय नमः॥ ॐ स्वस्तिभावाय नमः॥ ॐ भागिने नमः॥ ॐ भागकराय नमः॥ ॐ लघवे नमः॥*

*ॐ उत्संगाय नमः॥ ॐ महांगाय नमः॥ ॐ महागर्भपरायणाय नमः॥ ॐ कृष्णवर्णाय नमः॥ ॐ सुवर्णाय नमः॥ ॐ सर्वदेहिनामिनिन्द्राय नमः॥ ॐ महापादाय नमः॥ ॐ महाहस्ताय नमः॥ ॐ महाकायाय नमः॥ ॐ महायशसे नमः॥ ॐ महामूर्धने नमः॥ ॐ महामात्राय नमः॥ ॐ महानेत्राय नमः॥ ॐ निशालयाय नमः॥ ॐ महान्तकाय नमः॥ ॐ महाकर्णाय नमः॥ ॐ महोष्ठाय नमः॥ ॐ महाहनवे नमः॥ ॐ महानासाय नमः॥ ॐ महाकम्बवे नमः॥ ॐ महाग्रीवाय नमः॥ ॐ श्मशानभाजे नमः॥ ॐ महावक्षसे नमः॥ ॐ महोरस्काय नमः॥ ॐ अंतरात्मने नमः॥ ॐ मृगालयाय नमः॥ ॐ लंबनाय नमः॥ ॐ लम्बितोष्ठाय नमः॥ ॐ महामायाय नमः॥ ॐ पयोनिधये नमः॥ ॐ महादन्ताय नमः॥ ॐ महाद्रष्टाय नमः॥ ॐ महाजिह्वाय नमः॥ ॐ महामुखाय नमः॥ ॐ महारोम्णे नमः॥ ॐ महाकोशाय नमः॥ ॐ महाजटाय नमः॥ ॐ प्रसन्नाय नमः॥ ॐ प्रसादाय नमः॥ ॐ प्रत्ययाय नमः॥ ॐ गिरिसाधनाय नमः॥ ॐ स्नेहनाय नमः॥ ॐ अस्नेहनाय नमः॥ ॐ अजिताय नमः॥ ॐ महामुनये नमः॥ ॐ वृक्षाकाराय नमः॥ ॐ वृक्षकेतवे नमः॥ ॐ अनलाय नमः॥ ॐ वायुवाहनाय नमः॥*

*ॐ गण्डलिने नमः॥ ॐ मेरूधाम्ने नमः॥ ॐ देवाधिपतये नमः॥ ॐ अथर्वशीर्षाय नमः॥ ॐ सामास्या नमः॥ ॐ ऋक्सहस्रामितेक्षणाय नमः॥ ॐ यजुः॥ पादभुजाय नमः॥ ॐ गुह्याय नमः॥ ॐ प्रकाशाय नमः॥ ॐ जंगमाय नमः॥ ॐ अमोघार्थाय नमः॥ ॐ प्रसादाय नमः॥ ॐ अभिगम्याय नमः॥ ॐ सुदर्शनाय नमः॥ ॐ उपकाराय नमः॥ ॐ प्रियाय नमः॥ ॐ सर्वाय नमः॥ ॐ कनकाय नमः॥ ॐ काञ्चनवच्छये नमः॥ ॐ नाभये नमः॥ ॐ नन्दिकराय नमः॥ ॐ भावाय नमः॥ ॐ पुष्करथपतये नमः॥ ॐ स्थिराय नमः॥ ॐ द्वादशाय नमः॥ ॐ त्रासनाय नमः॥ ॐ आद्याय नमः॥ ॐ यज्ञाय नमः॥ ॐ यज्ञसमाहिताय नमः॥ ॐ नक्तंस्वरूपाय नमः॥ ॐ कलये नमः॥ ॐ कालाय नमः॥ ॐ मकराय नमः॥ ॐ कालपूजिताय नमः॥ ॐ सगणाय नमः॥ ॐ गणकराय नमः॥ ॐ भूतवाहनसारथये नमः॥ ॐ भस्मशयाय नमः॥ ॐ भस्मगोप्त्रे नमः॥ ॐ भस्मभूताय नमः॥ ॐ तरवे नमः॥ ॐ गणाय नमः॥ ॐ लोकपालाय नमः॥ ॐ आलोकाय नमः॥ ॐ महात्मने नमः॥ ॐ सर्वपूजिताय नमः॥ ॐ शुक्लाय नमः॥ ॐ त्रिशुक्लाय नमः॥ ॐ संपन्नाय नमः॥ ॐ शुचये नमः॥*

*ॐ भूतनिशेविताय नमः॥ ॐ आश्रमस्थाय नमः॥ ॐ क्रियावस्थाय नमः॥ ॐ विश्वकर्ममतये नमः॥ ॐ वराय नमः॥ ॐ विशालशाखाय नमः॥ ॐ ताम्रोष्ठाय नमः॥ ॐ अम्बुजालाय नमः॥ ॐ सुनिश्चलाय नमः॥ ॐ कपिलाय नमः॥ ॐ कपिशाय नमः॥ ॐ शुक्लाय नमः॥ ॐ आयुषे नमः॥ ॐ पराय नमः॥ ॐ अपराय नमः॥ ॐ गंधर्वाय नमः॥ ॐ अदितये नमः॥ ॐ ताक्ष्याय नमः॥ ॐ सुविज्ञेयाय नमः॥ ॐ सुशारदाय नमः॥ ॐ परश्वधायुधाय नमः॥ ॐ देवाय नमः॥ ॐ अनुकारिणे नमः॥ ॐ सुबान्धवाय नमः॥ ॐ तुम्बवीणाय नमः॥ ॐ महाक्रोधाय नमः॥ ॐ ऊर्ध्वरेतसे नमः॥ ॐ जलेशयाय नमः॥ ॐ उग्राय नमः॥ ॐ वंशकराय नमः॥ ॐ वंशाय नमः॥ ॐ वंशानादाय नमः॥ ॐ अनिन्दिताय नमः॥ ॐ सर्वांगरूपाय नमः॥ ॐ मायाविने नमः॥ ॐ सुहृदे नमः॥ ॐ अनिलाय नमः॥ ॐ अनलाय नमः॥ ॐ बन्धनाय नमः॥ ॐ बन्धकर्त्रे नमः॥ ॐ सुवन्धनविमोचनाय नमः॥ ॐ सयज्ञयारये नमः॥ ॐ सकामारये नमः॥ ॐ महाद्रष्टाय नमः॥ ॐ महायुधाय नमः॥ ॐ बहुधानिन्दिताय नमः॥ ॐ शर्वाय नमः॥ ॐ शंकराय नमः॥ ॐ शं कराय नमः॥ ॐ अधनाय नमः॥*

*ॐ अमरेशाय नमः॥ ॐ महादेवाय नमः॥ ॐ विश्वदेवाय नमः॥ ॐ सुरारिघ्ने नमः॥ ॐ अहिर्बुद्धिन्याय नमः॥ ॐ अनिलाभाय नमः॥ ॐ चेकितानाय नमः॥ ॐ हविषे नमः॥ ॐ अजैकपादे नमः॥ ॐ कापालिने नमः॥ ॐ त्रिशंकवे नमः॥ ॐ अजिताय नमः॥ ॐ शिवाय नमः॥ ॐ धन्वन्तरये नमः॥ ॐ धूमकेतवे नमः॥ ॐ स्कन्दाय नमः॥ ॐ वैश्रवणाय नमः॥ ॐ धात्रे नमः॥ ॐ शक्राय नमः॥ ॐ विष्णवे नमः॥ ॐ मित्राय नमः॥ ॐ त्वष्ट्रे नमः॥ ॐ ध्रुवाय नमः॥ ॐ धराय नमः॥ ॐ प्रभावाय नमः॥ ॐ सर्वगोवायवे नमः॥ ॐ अर्यम्णे नमः॥ ॐ सवित्रे नमः॥ ॐ रवये नमः॥ ॐ उषंगवे नमः॥ ॐ विधात्रे नमः॥ ॐ मानधात्रे नमः॥ ॐ भूतवाहनाय नमः॥ ॐ विभवे नमः॥ ॐ वर्णविभाविने नमः॥ ॐ सर्वकामगुणवाहनाय नमः॥ ॐ पद्मनाभाय नमः॥ ॐ महागर्भाय नमः॥ चन्द्रवक्त्राय नमः॥ ॐ अनिलाय नमः॥ ॐ अनलाय नमः॥ ॐ बलवते नमः॥ ॐ उपशान्ताय नमः॥ ॐ पुराणाय नमः॥ ॐ पुण्यचञ्चवे नमः॥ ॐ ईरूपाय नमः॥ ॐ कुरूकर्त्रे नमः॥ ॐ कुरूवासिने नमः॥ ॐ कुरूभूताय नमः॥ ॐ गुणौषधाय नमः॥*

*ॐ सर्वाशयाय नमः॥ ॐ दर्भचारिणे नमः॥ ॐ सर्वप्राणिपतये नमः॥ ॐ देवदेवाय नमः॥ ॐ सुखासक्ताय नमः॥ ॐ सत स्वरूपाय नमः॥ ॐ असत् रूपाय नमः॥ ॐ सर्वरत्नविदे नमः॥ ॐ कैलाशगिरिवासने नमः॥ ॐ हिमवद्गिरिसंश्रयाय नमः॥ ॐ कूलहारिणे नमः॥ ॐ कुलकर्त्रे नमः॥ ॐ बहुविद्याय नमः॥ ॐ बहुप्रदाय नमः॥ ॐ वणिजाय नमः॥ ॐ वर्धकिने नमः॥ ॐ वृक्षाय नमः॥ ॐ बकुलाय नमः॥ ॐ चंदनाय नमः॥ ॐ छदाय नमः॥ ॐ सारग्रीवाय नमः॥ ॐ महाजत्रवे नमः॥ ॐ अलोलाय नमः॥ ॐ महौषधाय नमः॥ ॐ सिद्धार्थकारिणे नमः॥ ॐ छन्दोव्याकरणोत्तर-सिद्धार्थाय नमः॥ ॐ सिंहनादाय नमः॥ ॐ सिंहद्रंष्टाय नमः॥ ॐ सिंहगाय नमः॥ ॐ सिंहवाहनाय नमः॥ ॐ प्रभावात्मने नमः॥ ॐ जगतकालस्थालाय नमः॥ ॐ लोकहिताय नमः॥ ॐ तरवे नमः॥ ॐ सारंगाय नमः॥ ॐ नवचक्रांगाय नमः॥ ॐ केतुमालिने नमः॥ ॐ सभावनाय नमः॥ ॐ भूतालयाय नमः॥ ॐ भूतपतये नमः॥ ॐ अहोरात्राय नमः॥ ॐ अनिन्दिताय नमः॥ ॐ सर्वभूतवाहित्रे नमः॥ ॐ सर्वभूतनिलयाय नमः॥ ॐ विभवे नमः॥ ॐ भवाय नमः॥ ॐ अमोघाय नमः॥ ॐ संयताय नमः॥ ॐ अश्वाय नमः॥ ॐ भोजनाय नमः॥*

*ॐ प्राणधारणाय नमः॥ ॐ धृतिमते नमः॥ ॐ मतिमते नमः॥ ॐ दक्षाय नमः॥ ॐ सत्कृयाय नमः॥ ॐ युगाधिपाय नमः॥ ॐ गोपाल्यै नमः॥ ॐ गोपतये नमः॥ ॐ ग्रामाय नमः॥ ॐ गोचर्मवसनाय नमः॥ ॐ हरये नमः॥ ॐ हिरण्यबाहवे नमः॥ ॐ प्रवेशिनांगुहापालाय नमः॥ ॐ प्रकृष्टारये नमः॥ ॐ महाहर्षाय नमः॥ ॐ जितकामाय नमः॥ ॐ जितेन्द्रियाय नमः॥ ॐ गांधाराय नमः॥ ॐ सुवासाय नमः॥ ॐ तपः॥सक्ताय नमः॥ ॐ रतये नमः॥ ॐ नराय नमः॥ ॐ महागीताय नमः॥ ॐ महानृत्याय नमः॥ ॐ अप्सरोगणसेविताय नमः॥ ॐ महाकेतवे नमः॥ ॐ महाधातवे नमः॥ ॐ नैकसानुचराय नमः॥ ॐ चलाय नमः॥ ॐ आवेदनीयाय नमः॥ ॐ आदेशाय नमः॥ ॐ सर्वगंधसुखावहाय नमः॥ ॐ तोरणाय नमः॥ ॐ तारणाय नमः॥ ॐ वाताय नमः॥ ॐ परिधये नमः॥ ॐ पतिखेचराय नमः॥ ॐ संयोगवर्धनाय नमः॥ ॐ वृद्धाय नमः॥ ॐ गुणाधिकाय नमः॥ ॐ अतिवृद्धाय नमः॥ ॐ नित्यात्मसहायाय नमः॥ ॐ देवासुरपतये नमः॥ ॐ पत्ये नमः॥ ॐ युक्ताय नमः॥ ॐ युक्तबाहवे नमः॥ ॐ दिविसुपर्वदेवाय नमः॥ ॐ आषाढाय नमः॥ ॐ सुषाढ़ाय नमः॥ ॐ ध्रुवाय नमः॥*

*ॐ हरिणाय नमः॥ ॐ हराय नमः॥ ॐ आवर्तमानवपुषे नमः॥ ॐ वसुश्रेष्ठाय नमः॥ ॐ महापथाय नमः॥ ॐ विमर्षशिरोहारिणे नमः॥ ॐ सर्वलक्षणलक्षिताय नमः॥ ॐ अक्षरथयोगिने नमः॥ ॐ सर्वयोगिने नमः॥ ॐ महाबलाय नमः॥ ॐ समाम्नायाय नमः॥ ॐ असाम्नायाय नमः॥ ॐ तीर्थदेवाय नमः॥ ॐ महारथाय नमः॥ ॐ निर्जीवाय नमः॥ ॐ जीवनाय नमः॥ ॐ मंत्राय नमः॥ ॐ शुभाक्षाय नमः॥ ॐ बहुकर्कशाय नमः॥ ॐ रत्नप्रभूताय नमः॥ ॐ रत्नांगाय नमः॥ ॐ महार्णवनिपानविदे नमः॥ ॐ मूलाय नमः॥ ॐ विशालाय नमः॥ ॐ अमृताय नमः॥ ॐ व्यक्ताव्यवक्ताय नमः॥ ॐ तपोनिधये नमः॥ ॐ आरोहणाय नमः॥ ॐ अधिरोहाय नमः॥ ॐ शीलधारिणे नमः॥ ॐ महायशसे नमः॥ ॐ सेनाकल्पाय नमः॥ ॐ महाकल्पाय नमः॥ ॐ योगाय नमः॥ ॐ युगकराय नमः॥ ॐ हरये नमः॥ ॐ युगरूपाय नमः॥ ॐ महारूपाय नमः॥ ॐ महानागहतकाय नमः॥ ॐ अवधाय नमः॥ ॐ न्यायनिर्वपणाय नमः॥ ॐ पादाय नमः॥ ॐ पण्डिताय नमः॥ ॐ अचलोपमाय नमः॥ ॐ बहुमालाय नमः॥ ॐ महामालाय नमः॥ ॐ शशिहरसुलोचनाय नमः॥ ॐ विस्तारलवणकूपाय नमः॥ ॐ त्रिगुणाय नमः॥ ॐ सफलोदयाय नमः॥*

*ॐ त्रिलोचनाय नमः॥ ॐ विषण्डागाय नमः॥ ॐ मणिविद्धाय नमः॥ ॐ जटाधराय नमः॥ ॐ बिन्दवे नमः॥ ॐ विसर्गाय नमः॥ ॐ सुमुखाय नमः॥ ॐ शराय नमः॥ ॐ सर्वायुधाय नमः॥ ॐ सहाय नमः॥ ॐ सहाय नमः॥ ॐ निवेदनाय नमः॥ ॐ सुखाजाताय नमः॥ ॐ सुगन्धराय नमः॥ ॐ महाधनुषे नमः॥ ॐ गंधपालिभगवते नमः॥ ॐ सर्वकर्मोत्थानाय नमः॥ ॐ मन्थानबहुलवायवे नमः॥ ॐ सकलाय नमः॥ ॐ सर्वलोचनाय नमः॥ ॐ तलस्तालाय नमः॥ ॐ करस्थालिने नमः॥ ॐ ऊर्ध्वसंहननाय नमः॥ ॐ महते नमः॥ ॐ छात्राय नमः॥ ॐ सुच्छत्राय नमः॥ ॐ विख्यातलोकाय नमः॥ ॐ सर्वाश्रयक्रमाय नमः॥ ॐ मुण्डाय नमः॥ ॐ विरूपाय नमः॥ ॐ विकृताय नमः॥ ॐ दण्डिने नमः॥ ॐ कुदण्डिने नमः॥ ॐ विकुर्वणाय नमः॥ ॐ हर्यक्षाय नमः॥ ॐ ककुभाय नमः॥ ॐ वज्रिणे नमः॥ ॐ शतजिह्वाय नमः॥ ॐ सहस्रपदे नमः॥ ॐ देवेन्द्राय नमः॥ ॐ सर्वदेवमयाय नमः॥ ॐ गुरवे नमः॥ ॐ सहस्रबाहवे नमः॥ ॐ सर्वांगाय नमः॥ ॐ शरण्याय नमः॥ ॐ सर्वलोककृते नमः॥ ॐ पवित्राय नमः॥ ॐ त्रिककुन्मंत्राय नमः॥ ॐ कनिष्ठाय नमः॥ ॐ कृष्णपिंगलाय नमः॥*

*ॐ ब्रह्मदण्डविनिर्मात्रे नमः॥ ॐ शतघ्नीपाशशक्तिमते नमः॥ ॐ पद्मगर्भाय नमः॥ ॐ महागर्भाय नमः॥ ॐ ब्रह्मगर्भाय नमः॥ ॐ जलोद्भावाय नमः॥ ॐ गभस्तये नमः॥ ॐ ब्रह्मकृते नमः॥ ॐ ब्रह्मिणे नमः॥ ॐ ब्रह्मविदे नमः॥ ॐ ब्राह्मणाय नमः॥ ॐ गतये नमः॥ ॐ अनंतरूपाय नमः॥ ॐ नैकात्मने नमः॥ ॐ स्वयंभुवतिग्मतेजसे नमः॥ ॐ उर्ध्वगात्मने नमः॥ ॐ पशुपतये नमः॥ ॐ वातरंहसे नमः॥ ॐ मनोजवाय नमः॥ ॐ चंदनिने नमः॥ ॐ पद्मनालाग्राय नमः॥ ॐ सुरभ्युत्तारणाय नमः॥ ॐ नराय नमः॥ ॐ कर्णिकारमहास्रग्विणमे नमः॥ ॐ नीलमौलये नमः॥ ॐ पिनाकधृषे नमः॥ ॐ उमापतये नमः॥ ॐ उमाकान्ताय नमः॥ ॐ जाह्नवीधृषे नमः॥ ॐ उमादवाय नमः॥ ॐ वरवराहाय नमः॥ ॐ वरदाय नमः॥ ॐ वरेण्याय नमः॥ ॐ सुमहास्वनाय नमः॥ ॐ महाप्रसादाय नमः॥ ॐ दमनाय नमः॥ ॐ शत्रुघ्ने नमः॥ ॐ श्वेतपिंगलाय नमः॥ ॐ पीतात्मने नमः॥ ॐ परमात्मने नमः॥ ॐ प्रयतात्मने नमः॥ ॐ प्रधानधृषे नमः॥ ॐ सर्वपार्श्वमुखाय नमः॥ ॐ त्रक्षाय नमः॥ ॐ धर्मसाधारणवराय नमः॥ ॐ चराचरात्मने नमः॥ ॐ सूक्ष्मात्मने नमः॥ ॐ अमृतगोवृषेश्वराय नमः॥ ॐ साध्यर्षये नमः॥ ॐ आदित्यवसवे नमः॥*

*ॐ विवस्वत्सवित्रमृताय नमः॥ ॐ व्यासाय नमः॥ ॐ सर्गसुसंक्षेपविस्तराय नमः॥ ॐ पर्ययोनराय नमः॥ ॐ ऋतवे नमः॥ ॐ संवत्सराय नमः॥ ॐ मासाय नमः॥ ॐ पक्षाय नमः॥ ॐ संख्यासमापनाय नमः॥ ॐ कलायै नमः॥ ॐ काष्ठायै नमः॥ ॐ लवेभ्यो नमः॥ ॐ मात्रेभ्यो नमः॥ ॐ मुहूर्ताहः॥क्षपाभ्यो नमः॥ ॐ क्षणेभ्यो नमः॥ ॐ विश्वक्षेत्राय नमः॥ ॐ प्रजाबीजाय नमः॥ ॐ लिंगाय नमः॥ ॐ आद्यनिर्गमाय नमः॥ ॐ सत् स्वरूपाय नमः॥ ॐ असत् रूपाय नमः॥ ॐ व्यक्ताय नमः॥ ॐ अव्यक्ताय नमः॥ ॐ पित्रे नमः॥ ॐ मात्रे नमः॥ ॐ पितामहाय नमः॥ ॐ स्वर्गद्वाराय नमः॥ ॐ प्रजाद्वाराय नमः॥ ॐ मोक्षद्वाराय नमः॥ ॐ त्रिविष्टपाय नमः॥ ॐ निर्वाणाय नमः॥ ॐ ह्लादनाय नमः॥ ॐ ब्रह्मलोकाय नमः॥ ॐ परागतये नमः॥ ॐ देवासुरविनिर्मात्रे नमः॥ ॐ देवासुरपरायणाय नमः॥ ॐ देवासुरगुरूवे नमः॥ ॐ देवाय नमः॥ ॐ देवासुरनमस्कृताय नमः॥ ॐ देवासुरमहामात्राय नमः॥ ॐ देवासुरमहामात्राय नमः॥ ॐ देवासुरगणाश्रयाय नमः॥ ॐ देवासुरगणाध्यक्षाय नमः॥ ॐ देवासुरगणाग्रण्ये नमः॥ ॐ देवातिदेवाय नमः॥ ॐ देवर्षये नमः॥ ॐ देवासुरवरप्रदाय नमः॥ ॐ विश्वाय नमः॥ ॐ देवासुरमहेश्वराय नमः॥ ॐ सर्वदेवमयाय नमः॥ ॐ अचिंत्याय नमः॥ ॐ देवात्मने नमः॥ ॐ आत्मसंबवाय नमः॥ ॐ उद्भिदे नमः॥ ॐ त्रिविक्रमाय नमः॥ ॐ वैद्याय नमः॥ ॐ विरजाय नमः॥ ॐ नीरजाय नमः॥ ॐ अमराय नमः॥ ॐ इड्याय नमः॥ ॐ हस्तीश्वराय नमः॥ ॐ व्याघ्राय नमः॥ ॐ देवसिंहाय नमः॥ ॐ नरर्षभाय नमः॥ ॐ विभुदाय नमः॥ ॐ अग्रवराय नमः॥ ॐ सूक्ष्माय नमः॥ ॐ सर्वदेवाय नमः॥ ॐ तपोमयाय नमः॥ ॐ सुयुक्ताय नमः॥ ॐ शोभनाय नमः॥ ॐ वज्रिणे नमः॥ ॐ प्रासानाम्प्रभवाय नमः॥ ॐ अव्ययाय नमः॥ ॐ गुहाय नमः॥ ॐ कान्ताय नमः॥ ॐ निजसर्गाय नमः॥ ॐ पवित्राय नमः॥ ॐ सर्वपावनाय नमः॥ ॐ श्रृंगिणे नमः॥ ॐ श्रृंगप्रियाय नमः॥ ॐ बभ्रवे नमः॥ ॐ राजराजाय नमः॥ ॐ निरामयाय नमः॥ ॐ अभिरामाय नमः॥ ॐ सुरगणाय नमः॥ ॐ विरामाय नमः॥ ॐ सर्वसाधनाय नमः॥ ॐ ललाटाक्षाय नमः॥ ॐ विश्वदेवाय नमः॥ ॐ हरिणाय नमः॥ ॐ ब्रह्मवर्चसे नमः॥ ॐ स्थावरपतये नमः॥ ॐ नियमेन्द्रियवर्धनाय नमः॥ ॐ सिद्धार्थाय नमः॥ ॐ सिद्धभूतार्थाय नमः॥ ॐ अचिन्ताय नमः॥ ॐ सत्यव्रताय नमः॥ ॐ शुचये नमः॥ ॐ व्रताधिपाय नमः॥ ॐ पराय नमः॥ ॐ ब्रह्मणे नमः॥ ॐ भक्तानांपरमागतये नमः॥ ॐ विमुक्ताय नमः॥ ॐ मुक्ततेजसे नमः॥ ॐ श्रीमते नमः॥ ॐ श्रीवर्धनाय नमः॥ ॐ श्री जगते नमः॥*

*ॐ पूर्णमदः॥ पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।*

*ॐ शांतिः॥ शांतिः॥ शांतिः॥*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

Monday, July 1, 2019

😎 अर्ररर्ररर्र ,,,,,,,,,खतर्रनाक 🔜 🤔स्त्रियांना नक्की काय पाहिजे....

😎 अर्ररर्ररर्र ,,,,,,,,,खतर्रनाक 🔜 🤔स्त्रियांना नक्की काय पाहिजे....

स्त्रियांना नक्की काय पाहिजे....

किंग आर्थर नावाचा एक राजा होता. एका बेसावध क्षणी त्याच्या शेजारच्या राज्यातील राजाने त्याच्यावर हल्ला केला व त्यास कैद करून तुरुंगात बंदिस्त केले. पण तरुण आर्थरच्या विचारांनी त्याचे मतपरिवर्तन झाले आणि त्याने आर्थरला जीवदान द्यायचे ठरवले.

पण त्यासाठी त्याने आर्थर समोर एक आव्हानात्मक अट ठेवली की तो आर्थरला एक प्रश्न विचारेल आणि त्याचे उत्तर देण्यासाठी वर्षभरासाठी मुक्त करेल. त्या वर्षभरात आर्थर त्याचे उत्तर देऊ शकला तर आर्थरला कायमचे अभय नाही तर मृत्युदंड.

तर तो प्रश्न होता की.....
" स्त्रियांना नेमके काय पाहिजे ? ”

या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता भल्या भल्यांनी हात टेकले होते, तर तरुण आर्थरकडून हे उत्तर शोधले जाणे म्हणजे चमत्कारच ठरला असता. पण जीव वाचवायचा असेल तर उत्तर शोधलंच पाहिजे म्हणून तो स्वतःच्या राज्यात परतला.

तिथे त्याने अनेकांकडे विचारणा केली. त्यात त्याची राणी, नावाजलेले विद्वान, दरबारातले गणमान्य व्यक्ती एवढेच काय तर राजविदुषकाचे ही मत घेतले. पण कुणीही या प्रश्नावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.

मग काही जणांनी सुचवले की राज्याच्या बाहेरच्या जंगलात जी म्हातारी चेटकीण राहते तिला जाऊन भेट, तिच्याशी सल्लामसलत कर. ती नक्कीच समर्पक उत्तर देऊ शकेल. पण तिचा सल्ला घेणे तुला चांगलेच महागात पडू शकते कारण ती चेटकीण केलेल्या उपकारांची अवाजवी किंमत वसूल करण्यासाठी कुप्रसिद्ध होती.

हाताशी असलेला वेळ वेगाने संपत होता म्हणून अखेर आर्थरने तिच्याकडे जायचे ठरवले.

चेटकिणीने आर्थरचा प्रश्न नीट ऐकून घेतला व धूर्तपणे उत्तरली, "मी या प्रश्नाचे उत्तर अवश्य देईन पण त्याबदल्यात तुला माझी एक इच्छा पूर्णा करावी लागेल; तुझा मित्र लॅन्सलॉटला माझ्याबरोबर लग्न करावे लागेल."

सर लॅनस्लॉट आर्थरचा जवळचा मित्र होता व त्याची ओळख एक कुलीन व्यक्तिमत्त्व व शूर
योद्धा अशी होती.

तिची हि मागणी ऐकून आर्थर सर्वार्थाने हादरला. ती चेटकीण जख्खड म्हातारी व दिसायला अत्यंत कुरूप होती. तिच्या मुखात केवळ एकच सुळा होता. तिच्या कंठातून चित्रविचित्र आवाज येत राहायचे व ति जिथे जाईल तिथे दुर्गंध पसरायचा.

आर्थरने तिची मागणी धुडकावून लावली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या मित्राला जिवंतपणी नरकयातना भोगायला लावायचे पाप त्याला माथी घ्यायचे नव्हते.

पण लॅन्सलॉटला जेव्हा हे कळले त्याने तडक चेटकिणीची मागणी पूर्ण करण्याचा हट्ट आर्थरकडे धरला. तो म्हणाला माझ्या मित्राच्या प्राणांपुढे हा त्याग काहीच नाही. नाईलाजाने का होईना आर्थरने लॅन्सलॉटचे म्हणणे मान्य केले. लॅनस्लॉट व चेटकीण यांच्या विवाहाची घोषणा झाली.

तेव्हा चेटकिणीने आर्थरचा जीव वाचवणारे उत्तर दिले की....

" स्त्रीला तिच्या स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार हवा असतो "

हे उत्तर ऐकून सर्वांना जाणीव झाली की चेटकिणीने एक महान सत्य उघड केले आहे.

शेजारच्या राज्याच्या राजालाही हे उत्तर पटले व त्याने आर्थरला सर्व बंधनांतून मुक्त केले. या घटनेच्या आनंदोत्सवाबरोबरच चेटकीण व लॅन्सलॉट यांचा विवाह धूमधडाक्याने पार पडला.

विवाहाच्या पहिल्या रात्री जड पावलांनी घाबरत घाबरतच लॅन्सलॉटने शयनकक्षात प्रवेश केला. पण समोरचे दृश्य बघून त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मंचकावर चेटकिणीऐवजी एक अतिसुंदर रूपगर्विता तरुणी बसली होती.

धक्क्यातून सावरल्यावर त्याने त्या तरुणीला विचारले की हा बदल कसा काय झाला ?

त्यावर ती म्हणाली की, मी चेटकीण असतानाही तू माझ्याशी एवढा प्रेमाने वागलास म्हणून मी ठरविले आहे की दिवसातला अर्धाच काळ मी चेटकीणीच्या रूपात राहीन आणि उरलेला अर्धा काळ या सुंदर व तरुण रूपात.

आता मी कोणत्या वेळी चेटकिणीच्या रूपात
राहायचे अन कोणत्या वेळी या रूपात राहायचे हे तुला ठरवायचे आहे.

यावर लॅनस्लॉटच्या मनात दोन विरुद्ध पर्यायांमुळे विचारांचे द्वंद्व सुरू झाले. दिवसा तरुणी होऊ दिले तर सर्वांसमोर रुपवान पत्नी म्हणून मिरवता येईल. पण रात्री एकांतात काय ?

अन त्याउलट पर्याय निवडला तर कसे होईल ?

आता कल्पना करा की लॅन्सलॉटच्या जागी तुम्ही आहात अन एका पर्यायाची निवड करायची आहे तर अशा वेळी तुम्ही कोणता पर्याय निवडला असता ?

तुमचा पर्याय ठरला असेल तर खाली लॅन्सलॉटचे उत्तर वाचा.

कुलीन लॅन्सलॉट चेटकिणीला म्हणाला की, आजपासून जरी तू माझी पत्नी असली तरी केव्हा कसे राहायचे हे ठरविण्याचा हक्क पूर्णपणे तुझाच आहे. तुला जेव्हा जसे आवडेल तेव्हा तू तशी राहा. माझी कसलीही हरकत राहणार नाही.

हे ऐकून चेटकीण लॅन्सलॉटवर प्रचंड खूष झाली व तिने त्याला वचन दिले की ती चेटकिणीच्या रूपाचा कायमचा त्याग करेन. कारण लॅनस्लॉटने तिला आदराने वागवले व तिच्या आयुष्याचे निर्णय घ्यायचा पूर्ण हक्क तिला दिला.
.
.
.
.
तात्पर्य :
" बायकोला मनाप्रमाणे वागू द्या, जीवन सुदर होईल
नाहीतर गाठ चेटकीणीशी आहे "

😰😅😜😂😝
कशी वाटली म्हणून नक्की कळवा आणि लाईक करा आणि शेअर करा.....













Copy paste from whatsapp
Copy from whatsapp copy pest from whatsapp
Copy pest from whatsapp 

Friday, June 21, 2019

😡आपण दुसऱ्यावर जळतोय का? याचे उत्तर



             Vivekanandpatil जय बजरंग संगीत कला मंच आंबाळा 8600549450

😡आपण दुसऱ्यावर जळतोय का⁉याचे उत्तर
☑फक्त आपल्यालाच माहित असते ,
☑दुसऱ्याला ते फार उशीरा कळते , त्यावेळी खरे तर आपली जळून🌚राख झालेली असते .
_प्रत्येक व्यक्ती स्वतः 💃🏾चांगले राहण्याचे दुसऱ्यावर न 😡जळण्याचे दररोज ठरवत असते , पण ते खूप अवघड आहे हे दिवसाच्या शेवटी लक्षात येते_ .
❌आपण आपल्या जळक्या वृत्तीला
    सोडू शकत नाही हेच खरे ,
👍🏾ज्याने या वृत्तीला सोडले आहे तो,
    _सर्वांग निर्मळ । चित्त जैसे गंगाजळ ।।_
     असा झालेला असतो .
✌🏾अशा माणसाला शुध्द आणि पवित्र होण्यासाठी कोणत्याही तिर्थक्षेत्रात स्नान करण्याची गरज लागत नाही .

🌚😡 *~जळकी वृत्ती~* 😡🌚
🔥आपल्याला मरेपर्यंत शुध्द होऊ देत नाही
🔥हे कळत असूनही वळत नाही .
🔥 _जळण्याची क्रिया ही तुलना करण्याने सुरू होते_ मग क्षेत्र कोणतेही असो , तुलना करण्याची आपल्याला सवय झालेली आहे .
🔥आपला कमीपणा एकवेळ माणूस सहन करतो , पण _दुसऱ्याचा मोठेपणा माणसाला सहन होत नाही ही जळण्याची सुरूवात असते_.
👻यात बदल होणे आणि करणे
     खूप अवघड आहे कारण
🤑आपला स्वभाव तसा झालेला आहे आणि
👻त्याची प्रत्येकाला जाणीव आहे तसेच
    त्याची सवयपण झालेली आहे .

💄 _comparison|तुलना_ हे जर 😡जळक्या वृत्तीचे बीज असेल तर हे बीज आपल्या मनात रूजू आणि वाढू न देणे हाच जळक्या वृत्तीला हद्दपार करण्याचा प्रभावी उपाय आहे .
💄तुलना सुरू होते त्यावेळी आपण
👎🏾आपल्याजवळ जे आहे त्याला पूर्ण विसरतो आणि 🦂दुसऱ्याकडे लक्ष केंद्रित करतो , म्हणजेच
_स्वतःच्या 🤜🤛शक्तीला , सामर्थ्याला विसरतो आणि दुसऱ्याच्या शक्तीचा आणि सामर्थ्याचा विचार सुरू होतो_ , म्हणजेच
 *आंतर्मुख असलेली वृत्ती बहिर्मुख होते* आणि 👎🏾हीच आपल्या खऱ्या दारिद्र्याची सुरूवात असते .

*तुलना सुरू होऊच द्यायची नसेल तर*
🤜🤛प्रथम स्वतःची पूर्ण ओळख करून घ्यावी लागते , म्हणजेच _रूपाला विसरून स्वरूपाला जाणावे लागते_.
🤜🤛जगात रूपात भिन्नता आहे आणि
  स्वरूपात समानता आहे ,
🤜🤛जेथे समानता आहे तेथे
  तुलना होऊच शकत नाही आणि
🤜🤛 तुलना नाही तेथे
  🌚जळणे शिल्लक रहात नाही .
_रूपातून स्वरूपात जाण्यासाठी_
                म्हणजेच
_विषमतेतून समतेत जाण्यासाठी_
   *जीवनात साधना सोडून*
                  म्हणजेच
            *आध्यात्म सोडून*
          अन्य कोणताही मार्ग नाही .
आपण 😡जळक्या वृत्तीला सोडत नाही तोपर्यंत 🔥आपण शुध्द आणि पवित्र होऊ शकत नाही म्हणजेच _चांगले होऊ शकत नाही_.
💃🏾चांगले दिसण्याचा प्रयत्न
  💄सगळेच करतात पण
🎅🏽 _चांगले असण्यासाठीचा प्रयत्न_
  ♨ *फक्त साधक करत असतात*
😡 जळकी वृत्ती आपल्याला 🔥जाळून 🌚राख करण्यापूर्वी या वृत्तीला जाळणे आपल्या हातात आहे .
😡जळणे जळत असणाऱ्यालाच
    त्रासदायक असते
🎅🏽ज्याच्यावर आपण जळत असतो
   तो निवांत असतो किंवा आपल्या जळण्याचा त्याला अंदाज आला तर त्याला आनंद होत असतो कारण _आपल्यावर कोणीतरी 😡जळतेय ही जाणीव माणसाला आनंद देत असते_.
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
   _आपण 😡जळून_
दुसऱ्याला आनंद देण्यापेक्षा
    _तुलना बंद करून_,
  _रूपातून स्वरूपात येऊन_,
   _विषमतेतून समतेत येऊन_
 *त्याच्यात मिसळून दोघे आनंदी होण्यात आपले आणि त्याचेही भले आहे* .
       🙏🏾बघा जमतेय का !🙏🏾
🌚धूर दिसला की😡आग लागलेली असते
                हे विसरू नका .
  ⚔⚔⚔⚔⚔⚔⚔

Thursday, June 20, 2019

👻👻संकटे 👻👻

_जीवनात अडचण आणि संकट नसेल तर_ 
      💃🏾 जगण्यातही 💄मजा रहात नाही. 

🤛🤜संकटकाळी आपण दिलेल्या लढ्यामुळे 
✌🏾आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो आणि 
😷अडचणीच्या काळात मानसिकदृष्ट्या स्थिर राहण्याने 
✌🏾आपल्या वागण्याला अर्थ प्राप्त होतो .
 _सगळे काही अलबेल असेल तरच 💃🏾आनंदी राहणारी माणसे *जगणे आणि वागणे दोन्ही विसरतात*_. 
🎅🏽 _सिंहावलोकन केले तर छोट्या मोठ्या संकटावर आणि अडचणीवर आपण केलेली 🤛🤜मात ज्या ज्यावेळी  आठवते_ 
☑त्या त्यावेळी मनाला उभारी येते , 
☑मन परत ताजेतवाने होते , 
☑नवी उमेद निर्माण होते, उत्साह संचारतो 
☑आणि हा आपल्या शक्तीचा, सामर्थ्याचा आपल्यालाच झालेला परिचय असतो . 

*जीवनात संकट/अडचणच नसेल तर* 
💪🏾आपली 🤛शक्ती आणि 🤜सामर्थ्य 
आपल्याला कधीच समजणार नाही . 
💪🏾जे भगवंताने, निसर्गाने आपल्याला 
        अमर्याद दिलेले आहे 
😔त्याचा कधी परिचयच झाला नाही तर 
😔त्याचा वापरच होणार नाही आणि 
_दिलेल्याचा वापर झाला नाही तर तो देणाऱ्याचा अपमान ठरतो_. 
🤜🤛बल आणि 😇बुद्धीचा खरा वापर आणि उपयोग संकटात आणि अडचणीत असतानाच होत असतो . त्यामुळे जीवनात 
*संकट आणि अडचण गरजेची आहे* 
_यांचे स्वरूप जेवढे मोठे तेवढा आपला 💪🏾पराक्रम आणि 🤜🤛कर्तुत्व मोठे ठरत असते आणि त्याचा 💃🏾आनंदही तसाच मोठा असतो_ . म्हणून 
🙏🏾 *देवाकडे काही मागायचे असेल तर*🙏🏾 
_जीवनात संकट आणि अडचण मागा_, 
हा उलटा प्रवास आहे आणि या मार्गावर 🤛🤜खंबीरपणे उभा राहणारा, चालणारा 💪🏾खरा वीर आहे . 
⚔लढण्यासाठी लागणारे 🤛🤜बल आणि ✒बुद्धी भगवंताने मुक्तहस्ते आपल्याला दिलेलीच आहे तरीही _तु आमच्या जीवनातील 😪संकटे आणि अडचण दूर कर म्हणून देवळात हेलपाटे मारणारे 👎🏾खरे कपाळकरंटे , पळपुटे आणि दळभद्री आहेत_. 
🤛🤜माणूस लढण्याने मोठा होत असतो 
🏃‍♀💃🏾आणि पळण्याने छोटा होत असतो. 
           आपल्या जीवनात 
    🤛🤜लढणे किती ⁉आणि
    🏃‍♀💃🏾 पळणे किती ⁉यावर
  समाज आपला 🏆दर्जा ठरवत असतो 
  तेथे 🤑पैशाचा काहीच संबंध नसतो . 
   ⚔⚔⚔⚔⚔⚔⚔
   ✒ *डॉ. आसबे ल.म*✒
  _अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार_
  💦💦💦💦💦💦💦💦
   📞मो.नं.९८२२२९२७१३📞

🤔🤔खांदा-🤔🤔- मेल्यावर आणी आधी

*खांदा ....*.

या जगात खांदा देणारे खूप भेटतील, पण
हात देणारे खूप दुर्मिळ आहेत.....

*मेलेल्या माणसाला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी जो मेलेला आहे त्याला त्याचा काहीच उपयोग नसतो.....*

जिवंतपणी तो अडचणीत असताना त्याला आपल्या आधाराच्या आणि मदतीच्या हाताची खूप गरज असते ,......!

तेथे हात पुढे करता आला तर त्याच्यासारखे दुसरे पुण्य नाही ...…
गरजवंताला हात देणारा खरा भगवंत आहे ....

*पण किती मेलेल्या माणसांना खांदा दिला यापेक्षा किती जीवंत माणसांना हात दिला यावर आपली माणूसकी ठरत असते .......*

      *_माणूस मेलेला कळताच धाऊन जाणारी माणसे ,_*
*_तो जिवंत असताना, अडचणीत असतानाच का बरं धाऊन जात नाहीत.......??_*

    *खरे तर माणूस मेल्यानंतर धावणाऱ्या माणसांची धावपळ व्यर्थ असते , कारण तुम्ही नाही गेला तरी माणसे त्याला जाळल्याशिवाय राहणार नाहीत ...... पण ही व्यर्थ धावपळ करणारेच खूप आहेत ....,*

अडचणीच्या काळात धावून येण्यासाठी देवच बनावे लागते आणि हे देवत्व नेहमी फार कमी दिसते आणि हे धावून जाणेच सार्थ असते.......

आपल्या देवाने एखाद्याला खांदा दिल्याचे एकही उदाहरण ग्रंथात नाही आणि
अडचणीच्या काळात देव धाऊन आला नाही ,
असे उदाहरण आपल्याला एकाही ग्रंथात सापडणार नाही......!!!

अंगात *देवत्व* असल्याशिवाय मदतीचा हात पुढे करता येत नाही....... ,
जिवंत माणसासाठी धाऊन जाणे *देवत्व* आहे.... आणि
मेलेल्या माणसासाठी धावणे ही फक्त *मजबूरी* आहे , कारण त्यात भीती असते , मी कोणाला गेलो नाही तर माझ्यावेळी कोण येईल .......?

मेल्यावर कोण आले .....? कोण नाही आले..??? ?
हे आपल्याला कळणार तरी आहे का ?
आणि कोणीच नाही आले तरी पंचमहाभूते आपल्या देहाला नेल्याशिवाय राहणार आहेत का......?

जे काही धावायचे असेल ते *जीवंतपणी,*
*जिवंत माणसासाठी* धावा ,
मेल्यावर खांदा देण्याऐवजी ,
*जिवंत असणाऱ्या अडचणीत सापडलेल्या एकाला तरी आयुष्यात खरा प्रामाणिक हात द्या..*

*_मरेपर्यंत त्याचा अभिमान वाटेल........._*
🙏🏻

😎अडाणी आईवडील😎

*अडाणी आईवडील*
😘😘😘😘😘😘😘😘
---------------------------------------------------------
मध्यमवर्गीय घरातील एका मुलाला १० वीच्या परिक्षेत ९०% गुण मिळाले वडील खुषीने Marksheet न्याहाळत आपल्या पत्नीला ... अग... छान लापशी बनव, तुझ्या लाडक्याला ९०% मार्क्स मिळालेत... शालांत परिक्षेत..!

 आई किचनमधुन पळत पळत येत म्हणाली, ".. बघुया मला दाखवा...!

 इतक्यात,.. मुलगा पटकन बोलला ...
 "बाबा तिला कुठे Result दाखवताय ?... तिला काय लिहता वाचता येते का.? अशिक्षित आहे ती...!"

भरल्या डोळ्याने पदर पुसत आई लापशी बनवायला निघुन गेली.

ही गोष्ट वडिलांना लगेच लक्षात आली...! मग ते मुलाच्या संवादात भर टाकुन म्हणाले... "हो रे ! ते पण खरच आहे...!

तु पोटात असताना तिला दुध बिल्कुल आवडत नसताना तु सुधृड व्हावास म्हणून नऊ महीने ती रोज दुध पित होती...
*अशिक्षित होती ना...*

तुला सकाळी सात वाजता शाळेत जाव लागायच म्हणजे स्वतः सकाळी पाच वाजता उठुन तुझ्या आवडीचा नाष्ता आणि डबा बनवायची.....
*अशिक्षित होती ना...*

तु रात्री अभ्यास करता करता झोपून जायचा तेव्हा येउन ती तुझी वह्या पुस्तक बरोबर भरुन तुझ्या अंगावर पांघरुन नंतरच झोपायची...
*अशिक्षित होती ना...*

तू लहानपणी बहुतेकवेळा आजारी असायचास... तेव्हा रात्र-रात्र  जागुन ती परत सकाळी तिची काम चोख करायची....
*अशिक्षित होती ना...*

तुला Branded कपडे घेउन द्या म्हणून माझ्या मागे लागायची आणि स्वतः मात्र एकाच साडीवर वर्षे चालवायची.
*अशिक्षित होती ना....*

बाळा.... चांगली शिकलेली लोक पहिला स्वतःला स्वार्थ आणि मतलब बघतात.. पण तुझ्या आईने आजवर कधीच तो बघितला नाही.
*अशिक्षित आहे ना ती...*

ती जेवण बनवुन आपल्याला वाढता वाढता कधी कधी स्वतः जेवायच विसरुन जायची... म्हणून  मी अभिमानाने सांगतो की *'तुझी आई अशिक्षित आहे...'*

हे सगळ ऐकुन मुलगा रङत रडत आईला बिलगुन बोलतो.. "आई मी तर फक्त पेपरवर ९०% मार्क मिळवलेत. पण माझ्या आयुष्याला १००% बनवणारी तु पहिली शिक्षक आहेस. आणि ज्या शिक्षकांची मुल ९०% मार्क मिळवतात.. त्या शिक्षकांकडे किती ज्ञान असेल ह्याचा मी कधी विचार केलाच नाही.
आई आज मला ९०% मार्क्स मिळवुन पण मी अशिक्षित आहे आणि तुझ्याकडे PHD च्या पण वरची Degree  आहे. कारण मी आज माझ्या आईच्या रुपात डॉक्टर, शिक्षक, वकिल, माझे कपडे शिवणारी Dress Designer, Best Cook ह्या सगळ्यांच दर्शन घेतल......!

*बोध:*.... प्रत्येक मुला- मुलीनी *जे आईवडिलांचा अपमान करतात, पाणउतारा करतात, शुल्लक कारणावरुन रागवतात.* त्यांनी विचार करावा.
त्यांच्यासाठी काय काय सोसलय आईवडिलांनी..🙏
*आई साठी नक्कीच शेअर करा.*👌😘

Friday, February 22, 2019

@ ज्ञानेश्वरी @अध्याय १ला अर्जुनविषादयोगः-ओवी क्र :- ४१ ते ६०

卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💎 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💎
 *अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः*
  🌹 *ओवी क्रमांक :- ४१ ते ५०* 🌹
     

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
🍁 🌟 *~_卐_~* *श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ* *~_卐_~* 🌟🍁


ना तरी नगरांतरीं वसिजे । तरी नागराचि होईजे ।
तैसें व्यासोक्तितेजें । धवळत सकळ ॥ ४१ ॥

कीं प्रथमवयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी ।
प्रगटे जैसी आगळी । अंगनाअंगीं ॥ ४२ ॥

ना तरी उद्यानीं माधवी घडे । तेथ वनशोभेची खाणी उघडे ।
आदिलापासौनि अपाडें । जियापरी ॥ ४३ ॥

नानाघनीभूत सुवर्ण । जैसें न्याहाळितां साधारण ।
मग अलंकारीं बरवेपण । निवाडु दावी ॥ ४४ ॥

तैसें व्यासोक्ति अळंकारिलें । आवडे तें बरवेपण पातलें ।
तें जाणोनि काय आश्रयिलें । इतिहासीं ॥ ४५ ॥

नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरूनि आंगीं ।
पुराणें आख्यानरूपें जगीं । भारता आलीं ॥ ४६ ॥

म्हणौनि महाभारतीं नाहीं । तें नोहेचि लोकीं तिहीं ।
येणें कारणें म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७ ॥

ऐसी जगीं सुरस कथा । जें जन्मभूमि परमार्था ।
मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥ ४८ ॥

जें अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम ।
परम मंगलधाम । अवधारिजो ॥ ४९ ॥

आतां भारतकमळपरागु । गीताख्यु प्रसंगु ।
जो संवादला श्रीरंगु । अर्जुनेंसीं ॥ ५० ॥

      🍁🍁 *मराठी अर्थ*🍁🍁


  *ज्याप्रमाणे*नगरात राहिल्यावर मानवास शहाणपण प्राप्त होते, त्या प्रमाणे व्यासांच्या सात्विक वाणीच्या तेजामुळे सर्व जग ज्ञानसंपन्न झाले. ।।४१।।

  तारुण्यात पदार्पण केल्यानंतर मुलीच्या अंगी सौंदर्याचा नवा बहर आलेला असतो आणि तो स्पष्टपणे दिसू लागतो.  ।।४२।।

  वसंत ऋतूचे आगमन झाले, की बागेतील वनशोभा पूर्वी पेक्षा अधिकच बहरून येते; जणू काही सौंदर्याची खाणच उघडते.  ।।४३।।

  लगडीच्या रुपात सोने पाहीले, तर त्याचे सौंदर्य सर्वसाधारण वाटते; परंतु त्या सोन्याच्या विविध कलाकुसरीचे दागिने बनविले, तर त्या सोन्याचे सौंदर्य विशेष रुपाने खुलून दिसते.  ।।४४।।

  महर्षी व्यासांच्या तेजस्वी बुद्धीतून प्रगटलेल्या विषयामध्ये सत्य, शिव आणि सुंदरतेचे दर्शन होते, हे पाहून जगातील अनेक इतिहासकारांनी महाभारताचा आश्रय केला आहे.  ।।४५।।

  आपणास मोठी प्रतिष्ठा लाभावी म्हणून स्वतःच्या अंगी नम्रता धरून सर्व पुराणे आख्यानरुपाने महाभारतात येऊन जगामध्ये प्रसिद्ध पावली.  ।।४६।।

  म्हणूनच महाभारतामध्ये जे नाही, ते तिन्ही लोकांमध्ये नाही. महर्षी व्यासांच्या नंतर त्रैलोक्यात जे भाष्यकार झाले, त्यांनी महाभारतातील सिद्धांताचा अभ्यास केला. 'व्यासोंच्छिष्ट जगतत्रय' असे म्हणतात.  ।।४७।।

  अशी ही जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली आणि परमार्थाची जन्मभूमी असलेली महाभारताची कथा आहे. ही कथा जनमेजय राजाला वैंशपायन ऋषींनी सांगितली.।।४८।।

  श्रोते हो ! ही कथा एकाग्रतेने श्रवण करा. हे महाभारत अद्वितीय,उत्तम,अतिपवित्र निरुपम आणि सर्व मांगल्याचे परम स्थान आहे.  ।।४९।।

  महाभारत हे जणू काही कमळ असून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास सुखसंवादाच्या रुपाने सांगितलेली गीता जणू काही त्यातील सुगंधी पराग आहे.  ।।५०।।


*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*"वसुदेव सुतं देवं कंस चाणुर मर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगदगुरुम्।।"*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢

     💠🌹 *राम कृष्ण हरी* 🌹 💠

🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💎 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💎
 *अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः*
  🌹 *ओवी क्रमांक :- ५१ ते ६०* 🌹
   

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
🍁 🌟 *~_卐_~* *श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ* *~_卐_~* 🌟🍁


*ना तरी शदब्रह्माब्धि । मथियला व्यासबुद्धि ।*
*निवडिलें निरवधि । नवनीत हें ॥ ५१ ॥*

मग ज्ञानाग्निसंपर्कें । कडसिलेंनि विवेकें ।
पद आलें परिपाकें । आमोदासी ॥ ५२ ॥

जें अपेक्षिजे विरक्तीं । सदा अनुभविजे संतीं ।
सोहंभावें पारंगतीं । रमिजे जेथ ॥ ५३ ॥

जें आकर्णिजें भक्तीं । जें आदिवंद्य त्रिजगतीं ।
तें भीष्मपर्वीं संगती । म्हणितली कथा ॥ ५४ ॥

जें भगवद्गीता म्हणिजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे ।
जें सनकादिकीं सेविजे । आदरेंसीं ॥ ५५ ॥

जैसें शारदीचिये चंद्रकळे । माजि अमृतकण कोंवळे ।
ते वेंचिती मनें मवाळें । चकोरतलगें ॥ ५६ ॥

तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा ।
अतिहळुवारपण चित्ता । आणूनियां ॥ ५७ ॥

हें शब्देंवीण संवादिजे । इंद्रियां नेणतां भोगिजे ।
बोलाआधि झोंबिजे । प्रमेयासी ॥ ५८ ॥

जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळें नेणती ।
तैसी परी आहे सेविती । ग्रंथीं इये ॥ ५९ ॥

कां आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंद्रु प्रकटतां ।
हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ॥ ६० ॥
     
       🍁 *मराठी अर्थ*🍁

     महर्षी व्यासांनी आपल्या प्रखर बुध्दीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून महाभारतरूपी अनुपमेय नवनीत काढले.  ।।५१।।

  मग ते नवनीत ज्ञानरुप अग्नीच्या संबंधाने विवेकपूर्वक घडविले; आणि त्याचा उत्तम परिपाक होऊन त्या लोण्याचे सुगंधी साजूक तूप झाले, ते म्हणजे *गीता* होय. ।।५२।।

  वैराग्यवान देखील या गीतेची इच्छा करतात. संतदेखील नेहमी या गीतेचा अनुभव घेतात. *'तो परमात्मा मी आहे'* अशा अभेद भावात असणारे ब्रम्हनिष्टदेखील या गीतेत रममाण होतात.  ।।५३।।

  भक्त जिचे परम श्रद्धेने श्रवण करतात, जी त्रैलोक्यात प्रथम वंदनीय आहे, जी भीष्मपर्वात प्रसंगाच्या अनुरोधाने सांगितली आहे.  ।।५४।।

  ती " *भगवतगीता*" होय. ब्रम्हदेव आणि महादेव तिची स्तुती करतात, सनकादिक परम श्रद्धेने तिचे श्रवण, मनन, पठण करतात. ।।५५।।

  शरद ऋतूतील चंद्रकलेत असलेले कोवळे अमृतकण चकोर पक्षांची पिल्ले जसे अतिशय मृदू मनाने वेचतात.  ।।५६।।

  त्या प्रमाणे श्रोत्यांने चित्त शुद्ध करून एकाग्रतेने, अत्यन्त हळुवार पणे *भगवदगीतेचा*अनुभव घ्यावा.  ।।५७।।

 शब्दांशिवाय या गीतेच्या अर्थाची मनातल्या मनात चर्चा करावी. इंद्रियांना नकळत याच्या अर्थाचा अनुभव घ्यावा. वक्ताच्या मुखातून शब्द प्रकट होण्यापूर्वीच त्यातील सिद्धांताशी एकरूप होऊन राहावे. ।।५८।।

  ज्या प्रमाणे भ्रमर कमलदलाला समजू न देता त्यातील पराग सेवन करतात, त्याप्रमाणे हा ग्रंथ जाणून घेण्याची पद्धत आहे.  ।।५९।।

  नभामध्ये चंद्रमा उदय पावला, की चंद्रविकासी कुमुदनी प्रफुल्ल होतात आणि आपले पाण्यातील स्थान न सोडता त्याला अलिंगन देण्याचे परमसुख जाणतात. ।।६०।।

*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*"वसुदेव सुतं देवं कंस चाणुर मर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगदगुरुम्।।"*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢

     💠🌹 *राम कृष्ण हरी* 🌹 💠

🔺🔅🔺🔅🔺🔅🔺🔅🔺🔅🔺

卐ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका卐=अध्याय १ला :- अर्जुनविषादयोगः-ओवी क्रं-२१ ते ४०

     卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💎 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💎
 *अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः*
  🌹 *ओवी क्रमांक :- २१ ते ३०* 🌹
       

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
🍁 🌟 *~_卐_~* *श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ* *~_卐_~* 🌟🍁

*आतां अभिनव वाग्विलासिनी । ते चातुर्यार्थकलाकामिनी* ।
ते शारदा विश्वमोहिनी । नमिली मियां ॥ २१ ॥

मज हृदयीं सद्‍गुरु । जेणें तारिलों हा संसारपूरु ।
म्हणौनि विशेषें अत्यादरु । विवेकावरी ॥ २२ ॥

जैसें डोळ्यां अंजन भेटे । ते वेळीं दृष्टीसी फांटा फुटे ।
मग वास पाहिजे तेथ । प्रगटे महानिधी ॥ २३ ॥

कां चिंतामणी जालियां हातीं । सदा विजयवृत्ति मनोरथीं ।
तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ति । ज्ञानदेवो म्हणे ॥ २४ ॥

म्हणोनि जाणतेनें गुरु भजिजे । तेणें कृतकार्य होईजे ।
जैसें मुळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ॥ २५ ॥

कां तीर्थें जियें त्रिभुवनीं । तियें घडती समुद्रावगाहनीं ।
ना तरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ॥ २६ ॥

तैसा पुढतपुढती तोचि । मियां अभिवंदिला श्रीगुरुचि ।
जो अभिलषित मनोरुचि । पुरविता तो ॥ २७ ॥

आतां अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुकां जन्मस्थान ।
कीं अभिनव उद्यान । विवेकतरूचें ॥ २८ ॥

ना तरी सर्व सुखाचि आदि । जे प्रमेयमहानिधि ।
नाना नवरससुधाब्धि । परिपुर्ण हे ॥ २९ ॥

कीं परमधाम प्रकट । सर्व विद्यांचे मूळपीठ ।
शास्त्रजाता वसौट । अशेषांचें ॥ ३० ॥

   🌹 *मराठी अर्थ*🌹

  *(सरस्वती-वंदन)* या नंतर नित्यनूतन प्रतिभा आणि वाणीच्या रुपाने क्रीडा करणारे चातुर्य, अर्थ व कला यांची कामिनी, विविध रस आणि अलंकार युक्त मधुर भाषेद्वारा संपूर्ण विश्वाला मोहित करणारी अशी जी शारदा, तिला मी विनम्र भावाने नमस्कार करतो.  ।।२१।।

  *(सद्गुरु-स्तवन)* श्री सद्गुरूंनी सांगितलेले ज्ञान मी माझ्या हृदयामध्ये साठविले ; त्या मुळे मला भवसागर तरुण जाता आला. म्हणून अंतःकरणातील विवेकावर माझे आत्यंतिक प्रेम आहे.  ।।२२।।

  *ज्या प्रमाणे* पायाळू माणसाच्या डोळ्यात अंजन घातले असता त्याची दृष्टी सर्वत्र पसरते आणि त्याला भूमीमध्ये असणाऱ्या संपत्तीचा ठसा दिसू लागतो.  ।।२३।।

  *मनोकामना* पूर्ण करणारा चिंतामणी हाती आला असता सर्व हेतू पूर्ण होतात, त्या प्रमाणे सद्गुरु निवृत्तीनाथांच्या मूळे मी पूर्णकाम झालो आहे. माझ्या सर्व सदिच्छा पूर्ण झाल्या आहेत, असे ज्ञानदेव म्हणतात.  ।।२४।।

  *या साठी* जाणकारांनी सद्गुरुवर परम श्रद्धा ठेवून आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावे, म्हणजे जीवन कृतकृत्य होईल. जसे, झाडाच्या मुळाला पाणी घातले असता फांद्या व पाने सहजच विकसित होतात.  ।।२५।।

  *एका समुद्र* स्नानामुळे त्रैलोक्यांत जेवढी तीर्थे आहेत, त्या सर्वांचे स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते ; किंवा एका अमृत रसाच्या सेवनाने जगातील सर्व रस सेवन केल्या प्रमाणे होते.  ।।२६।।

  *तसे एका सद्गुरूंना* वंदन केले असता, सर्वांना वंदन केल्याचे पुण्य प्राप्त होते ; म्हणून मी वारंवार सद्गुरूंना वंदन करतो, जे सद्गुरु मनातील सर्व सदिच्छा पूर्ण करतात.  ।।२७।।

  *आता सखोल* विचारांची कथा श्रवण करा. ही कथा सर्वांच्या मनात कौतुक उत्पन्न करणारी आहे अथवा विवेकरूपी वृक्षाचे नाविन्यपूर्ण उद्यान आहे.  ।।२८।।

  *ही महाभारतातील* गीता रुपी कथा सर्व मूळ कारण आहे. हे सर्व प्रमुख सिद्धांताचे भांडार आहे किंवा नवरसांनी परिपूर्ण भरलेला अमृताचा सागर आहे.  ।।२९।।

  *किंवा महाभारताच्या* रुपाने मोक्षच प्रगटलेला आहे. हे सर्व विद्यांचे मूळपीठ आहे. जगातील सर्व ज्ञानाचे आश्रयस्थान आहे.  ।।३०।।


*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*"वासुदेव सुतं देवम् कंस चानुर मर्दनम् देवकी परमानंदम् कृष्णम् वंदे जगदगुरुम्।।"*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢

     💠🌹 *राम कृष्ण हरी* 🌹 💠


🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💎 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💎
 *अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः*
  🌹 *ओवी क्रमांक :- ३१ ते ४०* 🌹

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
🍁 🌟 *~_卐_~* *श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ* *~_卐_~* 🌟🍁

  🍁 *श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ* 🍁

 *ना तरी सकळ धर्मांचें माहेर । सज्जनांचे जिव्हार* ।
लावण्यरत्‍नभांडार । शारदेचें ॥ ३१ ॥

   नाना कथारूपें भारती । प्रकटली असे त्रिजगतीं ।
आविष्करोनि महामतीं । व्यासाचिये ॥ ३२ ॥

म्हणौनि हा काव्यांरावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो ।
एथूनि रसां झाला आवो । रसाळपणाचा ॥ ३३ ॥

तेवींचि आइका आणिक एक । एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक ।
आणि महाबोधीं कोंवळीक । दुणावली ॥ ३४ ॥

एथ चातुर्य शहाणें झालें । प्रमेय रुचीस आलें ।
आणि सौभाग्य पोखलें । सुखाचें एथ ॥ ३५॥

माधुर्यीं मधुरता । श्रुंगारीं सुरेखता ।
रूढपण उचितां । दिसे भलें ॥ ३६ ॥

एथ कळाविदपण कळा । पुण्यासि प्रतापु आगळा ।
म्हणौनि जनमेजयाचे अवलीळा । दोष हरले ॥ ३७ ॥

आणि पाहतां नावेक । रंगीं सुरंगतेची आगळीक ।
गुणां सगुणपणाचें बिक । बहुवस एथ ॥ ३८ ॥

भानुचेनि तेजें धवळलें । जैसे त्रैलोक्य दिसे उजळिलें ।
तैसें व्यासमति कवळिलें । मिरवे विश्व ॥ ३९ ।।

कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें ।
तैसें भारतीं सुरवाडलें । अर्थजात ॥ ४० ॥

         🍁 *मराठीत अर्थ* 🍁

*श्री ज्ञानदेव माउली ३१व्या ओवी च्या प्रारंभी म्हणतात*
  *महाभारत* हे सर्व धर्माचे माहेर आहे, सज्जनांच्या जिव्हाळ्याचा, आनंदाचा विषय आहे; आणि सरस्वतीच्या सौंदर्यरूपी रत्नांचे भांडार आहे. ।।३१।।

  *सरस्वती* महर्षी व्यासांच्या विशाल बुद्धीत प्रगट होऊन विविध कथेच्या त्रैलोक्यात प्रसारित झाली. ।।३२।।

  *हा महाभारत* ग्रंथ सर्व काव्यग्रंथाचा राजा आहे. या ग्रंथाच्या ठिकाणी महानतेची परिसीमा झाली आहे. या ग्रंथा पासून काव्यातील रसांना रसाळपणाचा डौल आला आहे. ।।३३।।

  *तसेच,* या ग्रंथाचे आणखी महत्व श्रवण करा. महाभारतापासून शब्दरूप संपत्तीला शास्त्रीयता प्राप्त झाली आणि ब्रम्हज्ञानाच्या ठिकाणी कोवळिकता अधिकच वाढली. ।।३४।।

  *या महाभारतात* चातुर्य शहाणे झाले, सिद्धांताना अमृतमय गोडी प्राप्त झाली आणि सुखाचे ऐश्वर्य अधिकच पुष्ट झाले.  ।।३५।।

   *माधुर्याला* मधुरता, शृंगाराला सुरेखपणा आणि योग्य वस्तुंना श्रेष्ठपणा येऊन त्या सर्व उत्तम रीतीने शोभून दिसू लागल्या.  ।।३६।।

  *यातील* कथेपासून कलांना विशेष कौशल्य प्राप्त झाले. पुण्याचा प्रताप वाढू लागला. महाभारताच्या श्रावणाने जनमेजयाचे ब्रम्हहत्येचे दोष नाहीसे झाले.  ।।३७।।

  *सुक्षमबुद्धीने* महाभारताचे निरीक्षण केले असता असे दिसून येते की, विविध कलांतील गुण त्याने वाढले. या कथेमुळे सद्गुणांचें सामर्थ्य प्रगट झाले.  ।।३८।।

  *सूर्याच्या* तेजाने त्रैलोक्य जसे उजळून निघते, त्या प्रमाणे महर्षी व्यासांच्या विशाल बुद्धीतून निर्माण झालेल्या या कथेमुळे सर्व जगावर ज्ञानाचा प्रकाश पसरला आणि ते शोभून दिसू लागले.  ।।३९।।

  *उत्तम* जमिनीत बी पेरले असता जसा त्याचा सहज विस्तार होत जातो, त्या प्रमाणे महाभारतात सर्व विषय शोभायमान झाले आहेत. ।।४०।।

*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*"वासुदेव सुतं देवम् कंस चानुर मर्दनम् देवकी परमानंदम् कृष्णम् वंदे जगदगुरुम्।।"*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢

     💠🌹 *राम कृष्ण हरी* 🌹 💠

🔺🔅🔺🔅🔺🔅🔺🔅🔺🔅🔺

ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका 卐अध्याय १ला :- अर्जुनविषादयोगः=ओवी क्र :- ०१ ते २०

*卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💠 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💠
🙏अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः-(ओवी क्रमांक :- ०१ ते १०)
       


👏हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे👏

        卐-श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ-卐

ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या*।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा* ॥ १ ॥

देवा तूंचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु ।
म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥ २ ॥

हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।
जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥ ३ ॥

स्मृति तेचि अवयव । देखा आंगीक भाव ।
तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥ ४ ॥

अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें ।
पदपद्धति खेवणें । प्रमेयरत्‍नांचीं ॥ ५ ॥

पदबंध नागर । तेंचि रंगाथिले अंबर ।
जेथ साहित्य वाणें सपूर । उजाळाचें ॥ ६ ॥

देखा काव्य नाटका । जे निर्धारितां सकौतुका ।
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि ॥ ७ ॥

नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी ।
दिसती उचित पदें माझारीं । रत्‍नें भलीं ॥ ८ ॥

तेथ व्यासादिकांच्या मतीं । तेचि मेखळा मिरवती ।
चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ॥ ९ ॥

*देखा षड्दर्शनें म्हणिपती । तेची भुजांची आकृति* ।
*म्हणौनि विसंवादे धरिती । आयुधें हातीं ॥ १० ॥*



     🍁    मराठीत अर्थ   🍁

*(आत्मरूप-वंदन)*अनादीसिद्ध वेदांनी वर्णन केलेल्या , ज्याच्या त्याच्या स्वतः प्रत्येयास येणाऱ्या , विश्वस्वरूप निर्गुण आत्मरूपा , तुझा जयजयकार करून तुला नमस्कार करत आहे .।।1।।

   *(ओंकार रूप गणेश वंदन)* हे देवा ! सर्व विश्वाच्या बुद्धीला प्रकाश देणारा जो गणेश , तो तूच आहेस . निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात , तो गणेश कसा आहे ते अवधानपूर्वक ऐक. ।।2।।

  *संपूर्ण* वेद हीच जणू काही पोषाख केलेली  गणेशाची मूर्ती होय आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी शरीराचे सौंदर्य शोभून दिसते आहे.।।3।।

  *मन्वादिकांच्या* स्मुर्ती हे त्याचे अवयव आहते. ते अवयव या स्मुर्तीतील अर्थ-सौंदर्याने जणू लावण्याची केवळ खाणच बनले आहेत. ।।4।।

  *अठरा* पुराणे हे गणपतीच्या अंगावरील रत्नखचित अलंकार आहेत . त्यामध्ये सांगितलेली ही रत्ने; आणि शब्दांची छंदयुक्त रचना ही त्यांची कोंदणे आहेत ।।5।।

  *लालित्यपूर्ण* पदरचना हेच उत्कृष्ट रंगाने रंगविलेले वस्त्र आहे. शब्द-अलंकार आणि अर्थ-अलंकार हे त्या वस्रवरील तेज:पुंज दिसणारे जरीचे तलम तंतू आहेत.।।6।।

  *काव्य* आणि नाटक यांचा कौतुकाने विचार केला आसता, त्या गणपतीच्या पायातील रूणझुंणाऱ्या छोट्या-छोटया घागऱ्या आहेत अर्थ हा त्या घागऱ्यांना  बसविलेल्या घुंगराचा मंजूळ असा ध्वनी आहे.।।7।।

  *व्यास*,वाल्मिकी ,भरतमुनी यांच्या काव्य नाटकातील विविध सिद्धांताच्या शब्दांचा एकाग्रतेने अभ्यास केला , तर त्यात कवीचे अलौकिक कौशल्य दिसून येते . अशी ही  अनमोल शब्द-घागऱ्यांतील उत्तमोत्तम रत्ने आहेत ।।8।।

  *महर्षी* व्यासादिकांची बुद्धी ही गणपतीची मेखला म्हणजे कटिभूषण होय. त्याला लोंबत असलेल्या मोत्यांच्या पदरातील घोष हे त्या बुद्धीतील शुद्धत्व सात्विकपणे झळकत आहे.।।9।।

  *गणपतीचे* सहा हात ही सहा शास्त्रे होत ; म्हणून त्यांतील विविध प्रकारचा अभिप्राय ही त्या त्या हातातील वेगवेगळी शस्त्रे होत.।।10।।


*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

*卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💠 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💠
💢 *अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः* 💢
  🌹 *ओवी क्रमांक :- ११ ते २०* 🌹
     
*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे

卐-श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ-卐

तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु ।
वेदांतु तो महारसु । मोदकु मिरवे ॥ ११ ॥

एके हातीं दंतु । जो स्वभावता खंडितु ।
तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ॥ १२ ॥

मग सहजें सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु ।
धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ॥ १३ ॥

देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु ।
जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥ १४ ॥

 तरी संवादु तोचि दशनु । जो समता शुभ्रवर्णु ।
देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥ १५ ॥

मज अवगमलिया दोनी । मिमांसा श्रवणस्थानीं ।
बोधमदामृत मुनी । अली सेविती ॥ १६ ॥

प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ ।
सरिसेपणें एकवटत इभ- । मस्तकावरी ॥ १७ ॥

उपरि दशोपनिषदें । जियें उदारें ज्ञानमकरंदे ।
तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें । शोभती भलीं ॥ १८ ॥

अकार चरण युगल । उकार उदर विशाल ।
मकार महामंडल । मस्तकाकारें ॥ १९ ॥

हे तीन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें ।
तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें । आदिबीज ॥ २० ॥


🌺🌹 *मराठी अर्थ*  🌹🌺

  *न्याय* दर्शनातील सोळा पदार्थांचे विश्लेषण करणारा तर्क म्हणजे गणपतीच्या हातातील परशू होय. वैशेषिक दर्शनातील सात पदार्थांचा सिद्धांतभेद हा दुसऱ्या हातातील अंकुश आहे आणि उत्तरमीमांसा दर्शनातील ब्रम्हस्वरूप सिद्धांत हा गणपतीच्या हातातील अमृतमधुर मोदक होय.   ।।११।।

  *वार्तिककरांनी* सांगितलेले आणि स्वभावतःच खंडीत झालेले जी बौद्ध मत आहे, ते एका हातात असणाऱ्या खंडित दाताच्या ठिकाणी शोभते.  ।।१२।।

  *सत्कारवाद* हा गणपतीचा वर देणारा कामलासमान हात होय. हा धर्माची सिद्धी करतो आणि हा अभय देणारा हात आहे.  ।।१३।।

  *गणपतीच्या* ठिकाणी ब्रम्हानंद ही सरळ, निर्मळ आणि चांगले व वाईट याची निवड करण्यास समर्थ अशी सोंड आहे.  ।।१४।।

  *गुरू-शिष्याचा* हा सुखसवांद म्हणजे गणपतीच्या मुखतील दात असून ब्रम्हज्ञान प्राप्त झाल्यानंतर सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी निर्माण होणारी समता हा त्या दातांचा पांढरा रंग होय. ज्ञानदृष्टी म्हणजे त्या विघ्नराजाचे सूक्ष्म असे नेत्र होत.  ।।१५।।

  *पूर्वमीमांसा* आणि उत्तरमीमांसा हाच त्या गणपतीच्या कानांच्या ठिकाणी असून बोध हे त्याचे मदरूपी अमृत मुनिरूपी भ्रमर सेवन करतात, असे मला वाटते.  ।।१६।।

  *वेदशास्त्र* पुराणात सिद्धांतरुपाने संगतलेली तत्वे ही गणपतीच्या अंगावरील तेजयुक्त पोवळी होत. द्वैत आणि अद्वैत मते ही मस्तकावरील गंडस्थळे असून सारखे पणाने ती तेथे एकत्र झाली आहेत.  ।।१७।।

  *ज्ञानरूपी* मकरंद ज्या मध्ये परिपूर्ण भरलेला आहे, अशी ईशावास्य इत्यादी दहा उपनिषदे ही जणू सुगंधी फुले असून ती गणपतीच्या मुकुटावर उत्तम तऱ्हेने शोभून दिसत आहेत.  ।।१८।।

  *ओंकाराची* पहिली अकारमात्रा हे गणपतीचे दोन्ही पाय आहेत. दुसरी उकरमात्रा हे त्याचे मोठे पोट आहे. तिसरीमात्रा हा त्याचा मोठ्या वाटोळ्या मस्तकाच्या आकार आहे.  ।।१९।।

  *अकार, उकार, मकार* या तिन्ही मात्रा एकत्रित झाल्या, म्हणजे त्या ओंकारात संपूर्ण वेद संक्षेपाने समाविष्ट होत असतो. त्या बिजरूप ओंकाररूप गणपती देवरायास मी सद्गुरु श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपेने नमस्कार करतो.  ।।२०।।



*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
*"वासुदेव सुतं देवम् कंस चानुर मर्दनम् देवकी परमानंदम् कृष्णम् वंदे जगदगुरुम्।।"*


     🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏

Thursday, January 31, 2019

Yes, you can buy miracles, but Conditions apply.


👍होय,,,,! चमत्कार विकत मिळतो👍⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡              
                     *त्या लहानशा मुलीने तिच्या बचत बॉक्समधून सर्व नाणी काढुन फ्रॉकच्या खिशात टाकली व शेजारच्या केमिस्टच्या दुकानाच्या पाय-या चढली.*

          *ती काउंटर समोर उभी राहिली व औषध मागु लागली. पण तिची  काउंटरपेक्षा उंची कमी असल्यामुळे तिच्याकडे केमिस्टचे लक्ष गेले नाही. काउंटर वर गर्दी होती त्यामुळे कोणाचेही लक्ष तिच्याकडे गेले नाही..*

  *केमिस्टचा मित्र अमेरिकेहुन आला होता त्याच्याशी बोलण्यात केमिस्ट व्यस्त होता.*

             *त्या छोट्याश्या मुलीने खिशातून एक नाणें काढून काउंटरवर आपटले. त्याचा आवाज ऐकुन सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले. तिची युक्ती कामी आली.*

            *केमिस्ट तिच्याकडे आला ,  कौतुकाने व प्रेमाने म्हणाला , काय पाहिजे तुला बेटा..?*

   *"मला चमत्कार पाहिजे"*

       *केमिस्टला तिचे बोलणे न कळल्याने त्याने पुन्हा विचारले.... बेटा तुला काय पाहिजे... ?*

         *ती पुन्हा म्हणाली,  मला चमत्कार पाहिजे..*

         *केमिस्ट तिला म्हणाला , बेटा इथे चमत्कार मिळत नाही...* 

*ती पुन्हा म्हणाली, इथे जर औषध मिळतं तर चमत्कार सुद्धा इथेच मिळेल..!*

         *केमिस्टने विचारले  ,  बेटा तुला हे कोणी सांगितले?*

 *तेंव्हा ती छोटी मुलगी बोबड्या शब्दात म्हणाली..*

       *माझ्या भावाच्या डोक्यात ट्युमर झाला आहे. पप्पांनी आईला सांगितलं की डॉक्टरांनी चार लाख रुपये भरायला सांगितले आहेत, जर वेळेवर उपचार नाही झाले तर एखादा चमत्कारच त्याला वाचवू शकेल. माझे पप्पा रडत रडत आईला सांगत होते की, आपल्याकडे पैसे नाहीत. विकायला दागिने किंवा इस्टेट ही नाही. सर्व पैसे औषधोपचार करण्यात आधीच खर्च झालेत...*

        *त्या छोट्याश्या मुलीचे व केमिस्ट चे संभाषण ऐकून तो परदेशी पाहुणा तिच्या जवळ आला व म्हणाला, तु किती पैसे आणलेत चमत्कार घेण्यासाठी...?*

         *तिने आपली  छोटी मुठ उघडली व सर्व नाणी त्या पाहुण्याच्या हातावर ठेवली . त्याने ती मोजली. ते एकवीस रुपये पन्नास पैसे होते.* 

          *तो पाहुणा त्या निष्पाप व निरागस बालिकेकडे पाहुन हसला व म्हणाला...*

     *बेटा, तु चमत्कार विकत घेतलास....*

*चल, मला तुझ्या भावाकडे घेऊन चल..*

*तो पाहुणा ,जो आपल्या केमिस्ट मित्राला भेटायला अमेरिकेहुन आला होता तो दुसरा तिसरा कोणी नसून न्यूयॉर्कचा प्रसिद्ध न्यूरोसर्जन* *"डॉ.जॉर्ज अँडरसन" होता.* 

         *त्या सर्जनने  मुलीच्या भावाची सर्जरी एकवीस रुपये पन्नास पैशात केली व तो मुलगा मृत्यूच्या दाढेतुन बाहेर काढला..*

       *सर्जरी झाल्यानंतर हॉस्पीटल मधुन बाहेर पडताना  डॉ.जॉर्ज ने मुलीला उचलून घेतले व म्हणाला  ......   बेटा, कोण म्हणतो चमत्कार विकत मिळत नाही..?*

       *जरुर मिळतो...जरुर मिळतो..*

*ती छोटी बालिका मोठ्या श्रद्धेने चमत्कार विकत घेण्यासाठी केमिस्टकडे गेली होती..*

   *निसर्गाने तिचे प्रयत्न, तिचे सत्कर्म,तिची श्रद्धा खरी ठरविली.*

*जर नियत साफ व उद्देश चांगला असेल तर कोणत्या ना कोणत्या रुपात निसर्ग तुमची मदत करतो..*

      *हाच आस्थेचा चमत्कार आहे.* 

*जर ही पोस्ट वाचून तुम्ही गदगद् झाला असाल, आणि तुम्हालाही इतरांसाठी समर्पण भावना असेल, तर निसर्ग तुमच्या कडुनही असा चमत्कार घडविलच..*

*आपल्याबरोबर आपल्या सहवासातील इतर व्यक्तिंचे जीवन आपल्या प्रयत्नामुळे बहरले तर त्या आनंदाचे सोने झाल्याशिवाय रहात नाही.*

⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
 *निसर्ग हा सर्वश्रेष्ठ न्यायाधीश आहे.*
This is the coppy from whatsapp 

Saturday, January 19, 2019

Keep secret your few things


*स्त्री असो किंवा पुरुष, या गोष्टी  नेहमी गुप्त  ठेवाव्यात*
--------------------------------------------------

आपण आपल्या महत्त्वाच्या खाजगी गोष्टी नेहमी गुप्त ठेवणे आवश्यक आहेत. या गोष्टी इतरांना समजल्या तर भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

*येथे जाणून घ्या अशा  गोष्टी, ज्या नेहमी गुप्तच ठेवाव्यात...*

*१)अपमान -*
जर एखाद्या कारणामुळे अपमानाला सामोरे जावे लागले तर ही गोष्टही गुप्त ठेवावी. इतरांना ही गोष्ट माहिती पडल्यास त्यांच्यासाठी आपण हास्याचा विषय बनू शकतो.

*२)धनहानी -*
साध्यःच्या काळात पैशाला कोणत्याही व्यक्तीच्या शक्तीचे कारण मानले जाते. बहुतांश परिस्थितीमध्ये पैशाच्या आधारावरच नाते निभावले जातात आणि मैत्री केली जाते. यामुळे जर कधी धनहानीचा सामना करावा लागला तर ही गोष्ट गुप्त ठेवावी. धनहानीची गोष्ट इतरांना सांगितली तर अनेक लोक तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. धनहानी भरून काढण्यासाठी धनाची आवश्यकता असते आणि ही गोष्ट सर्वांना माहिती पडल्यास कोणीही आर्थिक मदत करणार नाही. तसेच तुमच्याजवळ भरपूर पैसा असेल तर ही गोष्टही गुप्तच ठेवावी.

*३)कुटुंबातील वाद -*
अनेक घरांमध्ये वाद होत असतात, ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु कौटुंबिक वादाची चर्चा घराबाहेर चुकूनही करू नये. असे केल्यास समाजात कुटुंबाची प्रतिष्ठा कमी होते. कुटुंबाबद्दल वाईट विचार करणारे लोक याचा फायदा घेऊ शकतात.

*४)मंत्र -*
गुरूने दिलेला मंत्र गुप्त ठेवावा. गुरुमंत्र गुप्त ठेवला तरच सिद्ध होतो. गुरुमंत्र गुप्त ठेवून उपासना केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होते.

*५)दान -*
गुप्त दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. शास्त्रानुसार जे लोक गुप्तदान करतात त्यांना अक्षय पुण्याची तसेच देवी-देवतांची विशेष कृपा प्राप्त होते. इतरांना सांगून दान केल्यास पुण्य प्राप्त होत नाही.

*६)पद-प्रतिष्ठा -*
जर तुम्ही एखाद्या मोठा पदावर असाल आणि समाजात मान-सन्मान असेल तर ही गोष्टही गुप्त ठेवावी, एखाद्या अनोळखी व्यक्तीसमोर ही गोष्ट सांगितल्यास अहंकाराचा भाव निर्माण होतो. अहंकार पतनाचे कारण ठरते आणि यामुळे आपली प्रतिष्ठाही कमी होते.

*७)एकांत-*
स्त्री-पुरुषाने  एकांताकडे विशेष लक्ष द्यावे. या कर्माशी संबंधित गोष्टी नेहमी गुप्त ठेवाव्यात. या गोष्टी इतरांना समजल्यास, हे आपल्या चारित्र्य आणि सामाजिक जीवनासाठी योग्य ठरत नाही.
--------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
Copy from whatsapp    🙏🙏
---------------------------------------------------

Jast read it जिवनात यशस्वी होण्यासाठी काय कराल?*



जिवनात यशस्वी होण्यासाठी काय कराल?*


👉🏽नकारात्मकता नकोच ?

स्वतःशी नकारात्मक गोष्टी बोलणे बंद करा. जेव्हा तुम्ही तुमच्या कारकिर्दीला नवीन दिशा देत असाल तेव्हा तुम्हाला प्रोत्साहन देणारे कदाचित कोणीही नसेल. अशात स्वतःबद्दल अनेक शंका यायला लागतात. तुमच्या नकारात्मक विचारांना तुमाच्यातूनच ताकद मिळते. तुम्ही त्यांच्यावर जेवढे जास्त फोकस करत तेवढेच ते प्रबळ होत जातील. तुमचे बहुतेक नकारात्मक विचार हे फक्त विचार आहेत, ते वस्तुस्थिती नाहीत. जेव्हा तुमचा तुमचे नकारात्मक विचार आणि निराशाजनक गोष्टींवर विश्वास बसू लागेल तेव्हा एक काम करा - तुम्ही ते विचार कुठेतरी लिहून ठेवा. तुम्ही जे काही करत असाल ते तिथेच थांबवा आणि विचार लिहून ठेवा. अशा प्रकारे तुमच्या निराशाजनक विचारांच्या वेगळा लगाम बसेल आणि तुम्ही गोष्टींना त्यांच्या प्रत्यक्ष रुपात जास्त तार्किक होऊन पाहू शकाल आणि वस्तुस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल.

👉🏽जर असे झाले तर काय?

स्वतःला "जर असे झाले तर काय?" विचारणे बंद करा. "जर असे झाले तर काय?" असे हायपोथेटिकल स्टेटमेंट आहे जे तुमची चिंता आणि ताण वाढवते, आणि ते तुमच्या प्रगतीच्या मार्गातील अडसर आहे. गोष्टी बिघडवायच्या असतील तर त्याचे शेकडो मार्ग आहेत, आणि तुम्ही त्या बिघडतील म्हणून विचार करत बसलात तर कृती कधी करणार? स्वतःला "जर असे झाले तर?" हे विचारणे तुम्हाला केवळ एकाच जागी घेऊन जाऊ शकते, जिथे तुम्हाला जायचे नाहीये, जाणे तुमची गरज नाहीये. पण तुमचे प्लान्स एकदम पक्के असले पाहिजेत. त्यांच्यात सर्व शक्यातांसाठी जागा असली पाहिजे. चिंतिती असल्यामुळे शोधत राहणे आणि भविष्य नजरेसमोर ठेऊन सर्व शक्यतांच्या दृष्टीने रणनीती आखण्याचे अंतर ओळखणे तुमाच्यासाठी आवश्यक आहे.

👉🏽व्यायाम आणि झोप

 आपला व्यायाम आणि झोप यांकडे लक्ष द्या .चांगल्या झोपेचे महत्त्व यावर मी यापेक्षा काही बोलू शकत नाही. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचा मेंदू न्यूरॉन्स मधु ती हानिकारक तत्व काढतो जी जागृत अवस्थेत उपस्थित असतात. समस्या केवळ हीच आहे की मेंदू ही तत्व तेव्हाच काढू शकतो जेव्हा तुम्ही झोपता. जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर ही हानिकारक तत्व तुमच्या मेंदूत उपस्थित राहतील आणि तुमचे कार्य शिथिल करतील. या नुकसानाची भरपाई तुम्ही जागरणासाठी चहा कॉफी पिऊन देखील करू शकत नाही म्हणूनच भरपूर काम केल्यानंतर आपले शरीर आणि मेंदू यांना पूर्ण आराम द्या.
तुमचे आत्म-नियंत्रण, ध्यान आणि मेमरी आवश्यक झोप मिळाली नाही तर आणि शांत झोप मिळाली नाही तर कमी होते. झोप अपूर्ण झाली आणि कोणताही तणाव जाणवला नाही तरी देखील अनेक प्रकारची स्ट्रेस हार्मोन्स निघतात जे तुमची प्रोडक्टिविटी कमी करतात. कधी कधी असेही होऊ शकते की तुम्ही कामाच्या जोशात आपली झोप टाळू लागता, परंतु तसे करणे तुमच्या हिताचे नहीये.
Eastern Ontario Research Institute मध्ये झालेल्या एका संशोधनात असे लक्षात आले आहे की १० आठवड्या पर्यंत दिवशी दोन वेळा व्यायाम करणाऱ्या व्यक्ती अधिक सोशल, एकेडमिक आणि एथलेटिक असतात. ते आपल्या बॉडी इमेज च्या बाबतीत जागरूक असतात आणि त्यांच्या आत्मविश्वासाचा स्तर सुद्धा जास्त असतो. सर्वांत चांगली गोष्ट ही आहे की व्यायाम केल्यामुळे त्यांच्या शरीरात वाढणारे लाभदायक हार्मोन्स शरीराला तत्काळ सकारात्मक उर्जेने भरून टाकतात. तसेच शरीरात होणारे फिजिकल परिवर्तन देखील आत्मविश्वासाचा स्तर उंचावण्यात सहाय्यक असतात.
तुम्ही तुमच्या दिवसभराच्या कामांना सांभाळून व्यायाम अशा प्रकारे योजा की तो चुकू नये नाहीतर तुमचा संपूर्ण दिवस वाया जाईल.


Thursday, November 15, 2018

💎"एक चुटकी ज़हर रोजाना"💎

     
  💎"एक चुटकी ज़हर रोजाना"💎
सुना था कभी किसीसे,
की ये दुनिया मोहोब्बत से चलती है,
करीब से जाना तो समझे,
ये स्वार्थ की दुनिया है,
बस जरुरत से चलती है !!






आरती नामक एक युवती का विवाह हुआ और वह अपने पति और सास के साथ अपने ससुराल में रहने लगी। कुछ ही दिनों बाद आरती को आभास होने लगा कि उसकी सास के साथ पटरी नहीं बैठ रही है। सास पुराने ख़यालों की थी और बहू नए विचारों वाली।
आरती और उसकी सास का आये दिन झगडा होने लगा।
दिन बीते, महीने बीते. साल भी बीत गया. न तो सास टीका-टिप्पणी करना छोड़ती और न आरती जवाब देना। हालात बद से बदतर होने लगे। आरती को अब अपनी सास से पूरी तरह नफरत हो चुकी थी. आरती के लिए उस समय स्थिति और बुरी हो जाती जब उसे भारतीय परम्पराओं के अनुसार दूसरों के सामने अपनी सास को सम्मान देना पड़ता। अब वह किसी भी तरह सास से छुटकारा पाने की सोचने लगी.
एक दिन जब आरती का अपनी सास से झगडा हुआ और पति भी अपनी माँ का पक्ष लेने लगा तो वह नाराज़ होकर मायके चली आई।
आरती के पिता आयुर्वेद के डॉक्टर थे. उसने रो-रो कर अपनी व्यथा पिता को सुनाई और बोली – “आप मुझे कोई जहरीली दवा दे दीजिये जो मैं जाकर उस बुढ़िया को पिला दूँ नहीं तो मैं अब ससुराल नहीं जाऊँगी…”
बेटी का दुःख समझते हुए पिता ने आरती के सिर पर प्यार से हाथ फेरते हुए कहा – “बेटी, अगर तुम अपनी सास को ज़हर खिला कर मार दोगी तो तुम्हें पुलिस पकड़ ले जाएगी और साथ ही मुझे भी क्योंकि वो ज़हर मैं तुम्हें दूंगा. इसलिए ऐसा करना ठीक नहीं होगा.”
लेकिन आरती जिद पर अड़ गई – “आपको मुझे ज़हर देना ही होगा ….
 अब मैं किसी भी कीमत पर उसका मुँह देखना नहीं चाहती !”
कुछ सोचकर पिता बोले – “ठीक है जैसी तुम्हारी मर्जी। लेकिन मैं तुम्हें जेल जाते हुए भी नहीं देख सकता इसलिए जैसे मैं कहूँ वैसे तुम्हें करना होगा ! मंजूर हो तो बोलो ?”
“क्या करना होगा ?”, आरती ने पूछा.
पिता ने एक पुडिया में ज़हर का पाउडर बाँधकर आरती के हाथ में देते हुए कहा – “तुम्हें इस पुडिया में से सिर्फ एक चुटकी ज़हर रोज़ अपनी सास के भोजन में मिलाना है।
कम मात्रा होने से वह एकदम से नहीं मरेगी बल्कि धीरे-धीरे आंतरिक रूप से कमजोर होकर 5 से 6 महीनों में मर जाएगी. लोग समझेंगे कि वह स्वाभाविक मौत मर गई.”
पिता ने आगे कहा -“लेकिन तुम्हें बेहद सावधान रहना होगा ताकि तुम्हारे पति को बिलकुल भी शक न होने पाए वरना हम दोनों को जेल जाना पड़ेगा ! इसके लिए तुम आज के बाद अपनी सास से बिलकुल भी झगडा नहीं करोगी बल्कि उसकी सेवा करोगी।
 यदि वह तुम पर कोई टीका टिप्पणी करती है तो तुम चुपचाप सुन लोगी, बिलकुल भी प्रत्युत्तर नहीं दोगी ! बोलो कर पाओगी ये सब ?”
आरती ने सोचा, छ: महीनों की ही तो बात है, फिर तो छुटकारा मिल ही जाएगा. उसने पिता की बात मान ली और ज़हर की पुडिया लेकर ससुराल चली आई.
ससुराल आते ही अगले ही दिन से आरती ने सास के भोजन में एक चुटकी ज़हर रोजाना मिलाना शुरू कर दिया।
 साथ ही उसके प्रति अपना बर्ताव भी बदल लिया. अब वह सास के किसी भी ताने का जवाब नहीं देती बल्कि क्रोध को पीकर मुस्कुराते हुए सुन लेती।
रोज़ उसके पैर दबाती और उसकी हर बात का ख़याल रखती।
सास से पूछ-पूछ कर उसकी पसंद का खाना बनाती, उसकी हर आज्ञा का पालन करती।

कुछ हफ्ते बीतते बीतते सास के स्वभाव में भी परिवर्तन आना शुरू हो गया. बहू की ओर से अपने तानों का प्रत्युत्तर न पाकर उसके ताने अब कम हो चले थे बल्कि वह कभी कभी बहू की सेवा के बदले आशीष भी देने लगी थी।
धीरे-धीरे चार महीने बीत गए. आरती नियमित रूप से सास को रोज़ एक चुटकी ज़हर देती आ रही थी।
किन्तु उस घर का माहौल अब एकदम से बदल चुका था. सास बहू का झगडा पुरानी बात हो चुकी थी. पहले जो सास आरती को गालियाँ देते नहीं थकती थी, अब वही आस-पड़ोस वालों के आगे आरती की तारीफों के पुल बाँधने लगी थी।
 बहू को साथ बिठाकर खाना खिलाती और सोने से पहले भी जब तक बहू से चार प्यार भरी बातें न कर ले, उसे नींद नही आती थी।
छठा महीना आते आते आरती को लगने लगा कि उसकी सास उसे बिलकुल अपनी बेटी की तरह मानने लगी हैं। उसे भी अपनी सास में माँ की छवि नज़र आने लगी थी।
जब वह सोचती कि उसके दिए ज़हर से उसकी सास कुछ ही दिनों में मर जाएगी तो वह परेशान हो जाती थी।
इसी ऊहापोह में एक दिन वह अपने पिता के घर दोबारा जा पहुंची और बोली – “पिताजी, मुझे उस ज़हर के असर को ख़त्म करने की दवा दीजिये क्योंकि अब मैं अपनी सास को मारना नहीं चाहती … !
 वो बहुत अच्छी हैं और अब मैं उन्हें अपनी माँ की तरह चाहने लगी हूँ!”
पिता ठठाकर हँस पड़े और बोले – “ज़हर ? कैसा ज़हर ? मैंने तो तुम्हें ज़हर के नाम पर हाजमे का चूर्ण दिया था … हा हा हा !!!”
"बेटी को सही रास्ता दिखाये,
माँ बाप का पूर्ण फर्ज अदा करे***#pma


Copy from whatsapp 
Copy from whatsapp 
Copy from whatsapp  

Wednesday, November 14, 2018

💍💎 अर्ध्या भाकरीचं कर्ज 💍💎

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

बायको सतत आईवर आरोप करत होती..........
आणितिला आपल्या मर्यादेत राहन्यास सांगत होता...
पण बायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती
ती जोरजोरात ओरडून सांगत होती
"मी अंगठी टेबलवरच ठेवली होती
आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच् आलेलं नव्हतं..
अंगठी असो वा नसो ती आईनेच उचललीये"
गोष्ट जेव्हा पतिच्या सहनशक्तिच्या बाहेर गेली..
त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेऊन दिली..
तिन महिन्या पूर्वीच लग्न झालेलं होतं..
पत्नीला ती चापट सहन झाली नाही.ती घर सोडून चालली
आणि जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला....
कि तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का??
तेव्हा पति ने उत्तर दिले
त्या उत्तराला ऐकून
दरवाजा मागे उभी असलेली आई हे ऐकून तिचे मन भरून आले
पति ने पत्नी ला सांगितले..
"जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले
आई अजुबाजूच्या परिसरात झाड़ू मारुन थोड़े पैसे आनायची ज्यात एक वेळेचं
पोट भरायचं.
आई एका ताटात भाकर वाढायची
आणि
रिकाम्या डब्याला झाकुन् ठेवायचि
आणि म्हणायची
माझ्या भाकरी या डब्यात आहेत बाळा तू खा.
मी पण नेहमी अर्धी भाकर खाऊन म्हणायचो
आई माझं पोट भरलय आता मला नाही खायचं.
आईने माझी उष्टी अर्धी भाकर खाऊन माझं पालन पोषण केलं आणि मोठं केलं
आज मी दोन भाकरी कमवायच्या लायकिचा झालो
पण हे कसं विसरु की आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं,
ती आई या स्तिथिला अशा अंगठी साठी भुकेलि असेल हा मी विचार सुद्धा करू शकत नाही..
तू तर तिन महिन्यापासूनच माझ्या सोबत आहे.
मी तर आईच्या तपश्चर्यला 25 वर्षापासून बघितलय.
हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रु आले.
ति समजूच् शकत नव्हती की मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज फेड़तोय की
ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज....
या मेसेज़ला शेयर करायला कोणतीच शपथ नाहिये.
आवडला तर नक्कीच शेयर करा..


🚩🙏(सदर लेख व्हॉट्सप वरून कॉपी केला)
🚩

🚩🙏(सदर लेख व्हॉट्सप वरून कॉपी केला)

Tuesday, November 13, 2018

उद्योग आणि मराठी माणूस.


                     *अत्यंत महत्वाचे*
---              
                -उद्योग आणि मराठी माणूस.-----------

----------------
*_शेतकर्‍यांना  सुखी होण्यासाठी महत्वाच्या  टिप्स_*
--------------------------------
शेतकर्‍यांना आपण राजा म्हणतो, पण तोच आज अडचणीत, दारिद्र्यात, दुष्काळात होरपळत आहे. तो व त्याची पुढची पिढी श्रीमंत, सुखी व्हावी यासाठी काय करायला हवे, यासाठी मी काही टिप्स देत आहे.

*भाग - १*

*१) माहिती घ्या :*
शेतकर्‍यांनो हे जग माहितीचे आहे. ज्याच्याकडे चांगली, जास्त व अद्ययावत माहिती आहे, त्याची फसगत होत नाही. काय करायचे, काय नाही करायचे याचे ज्ञान व योग्य निर्णय घेता येतो. पुस्तके, वृत्तपत्रे, इंटरनेट इत्यादींचा वापर करा व सतत माहिती घेत रहा.

*२) एकत्र या :*
खेकड्याप्रमाणे एकमेकांचे पाय ओढण्याचा गुण सोडा. भाऊबंधकीमुळे इतिहास काळापासून मराठी समाजाचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. तेव्हा एकीचे बळ लक्षात ठेवा. एकीमुळे मानसिक बळ मिळते, प्रगती होते; तेव्हा कुटुंबात, गावात समाजात व भावकीत एकीने वागा.

*3) पुढार्‍यापासून लांब :*
देश स्वतंत्र झाल्यापासून शेतकर्‍यांचा सर्वाधिक वेळ कोणी खाल्ला असेल, तर तो म्हणजे पुढारी. मोर्चा न्यायला, मोठा नेता आला भाषणाला चला, पाणी परिषेदेला चला. नुसती दिशाभूल आणि गंडवागंडवी. पुढार्‍यांच्या नादाला लागून कित्येक शेतकर्‍यांनी शेतीकडे दुर्लक्ष केले, शेती सावकारांना विकली, कुटुंब वार्‍यावर व शेवटी बायको मुलांना दुसर्‍यांच्या शेतावर मोल मजुरी करण्याची वेळ आली. तेव्हा पुढार्‍यापासून दोन हात लांब रहा.

*४) सावकाराचे नाव नको :*
मदर इंडिया सिनेमा तुम्ही बघितला असेल, सावकारीपाशामुळे कसे लाखो करोडो शेतकऱ्यांचे कसे नुकसान झाले. तेव्हा सावकाराचे पैसे कोणत्याही परिस्थितीत घेऊ नका.

*५) व्यापार्‍यापासून सावध :*
अनादी काळापासून शेतकर्‍यांना पिळणारा प्राणी म्हणजे व्यापारी. त्याच्या दर पाडण्याच्या कलेपासून सावध रहा. आपला माल हवंतर उशिरा विका पण व्यापार्‍यांना बळी जाऊ नका. स्वतः व्यापार शिका; व्यापारी, सावकार, पुढारी ह्या त्रिकुटापासून लांब व सावध रहा.

*६) काम म्हणजे भक्ती :*
आपली शेती व काम सोडून १५ दिवस वारीला व देवदेव करणारे शेतकरी पाहिले. शेतकरी १५ दिवस वारीला व शेत, कामधंदा तिकडे वार्‍यावर, अशी अवस्था नसावी. काम ही भक्ती आहे लक्षात ठेवा. कीर्तनकार बाबा रोज २५ हजार कमावतो व तुम्ही ठणठण गोपाळ, तेव्हा जागे व्हा.

*७) एकतरी व्यवसाय :*
शेतीसोबत एकतरी व्यवसाय कराच, फक्त शेतीवर अवलंबून राहू नका. कोणताही असो, छोटा मोठा व्यवसाय सुरू कराच.

*८) एकाने बाहेर :*
घरातील सर्वांनीच शेतीवर अवलंबून राहू नका. घरातील किमान एकतरी मुलाने गावाबाहेर पडा. शहरात, परदेशात, व्यवसायात जा. बाहेरील पैसा भांडवल म्हणून वापरता येईल व सावकारी पाश पडणार नाही.

*९) स्वतःसाठी अन्न :*
मी अनेक ऊस, द्राक्षं उत्पादक व बड्या शेतकर्‍यांना भेटलो, ते पण स्वतःसाठी लागणारे धान्य, भाजीपाला बाजारातून विकत आणतात. तेव्हा किमान १० गुंठे जमिनीत स्वतःसाठी लागणारी फळे, भाजीपाला, धान्य घरी वर्षभर पुरेल एवढे पिकवा. केवळ पैशासाठी शेती करू नका, स्वतःसाठी सकस आहार घ्या.

*१०) स्त्रीभ्रूण हत्या नको :*
मुलगा होण्याच्या हव्यासापोटी स्त्रीभ्रूण हत्या करू नका. स्त्री म्हणजे लक्ष्मीचे रूप. जर तुम्ही लक्ष्मीची हत्या करत असाल, तर तुमच्या घरात श्रीमंती कशी येणार. अशा विचाराने तुमच्या घरात कधीही समृध्दी येणार नाही.

*११) कमी खर्चात लग्न :*
मोठा मंडप घातला, गाव लाडू, जिलेबी खाऊन गेले, पण कर्ज फेडणार तुम्ही. नाही तर मग दोन एकर विकायचे. शेवटी अक्षदा पडली की संपलं, पुन्हा कोणीही येणार नाही.

*१२) मुलामुलीत समान वाटणी :*
मृत्युपत्रात मुला व मुलींना समान वाटणी द्या, कारण तुमच्यावर सर्वाधिक प्रेम करणारी मुलगीच असते. प्रेतावर रडणारी फक्त बायको व मुलगीच असते व वृध्दाश्रमात पाठवणारा मुलगा असतो हे लक्षात ठेवा. म्हातारं कधी टपकतयं व दोन एकर कधी विकतोय याची वाट पाहणारा मुलगा असतो, हे लक्षात ठेवा.

*१३) बायकोच्या नावे १ एकर :*
जिने तुमची अर्धांगिनी म्हणून जीवन काढले, तिला तुमच्या मृत्यूनंतर कोणत्याही सुना सांभाळणार नाहीत हे लक्षात ठेवा. तेव्हा किमान एक एकर जमीन बायकोच्या नावे करा, नाहीतर तिला म्हातारपणी जनावराच्या गोठ्यात जागा दिली जाईल.

आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. त्या अनुषंगाने पुढील लेखात त्यासंबंधीचे विवेचन करण्याचा व माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा. 

- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया
व्हॉटसअॅप -९८६७८०६३९९
-----------------------------
*नवी अर्थक्रांतीची बिजनेसविषयक पुस्तके विकत घेण्यासाठी -*
http://bit.ly/2OMAD3q
(सदरील लेख व्हॉट्सप वरून कॉपी पेस्ट केला )

                       
              🤗Believe in the self ,self is infinite  🤗

Monday, November 12, 2018

🌱उसावरील रोग व त्यावरील उपाय🌱

           🌾🌱🌲कृषिसमर्पण🌾🌱🌲


🎋 [उसावरील रोग व त्यावरील उपाय]🎋

   (1)==  चाबूक काणी 🎋,,,,,
               ===>    चाबूक काणी हा रोग युस्टिलॅगो सायटॅमिनी बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होते. हा रोग उसाचे को - ७४० या जातीवर जास्त प्रमाणत आढळतो. ऊस पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत हा रोग दिसून येतो. या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे रोगग्रस्त उसाचे शेंड्यातून चकचकीत चंदेरी रंगाचा चाबकाप्रमाणे निमुळता होत जाणारा पट्टा बाहेर पडतो. लवकरच पट्ट्यावरील चंदेरी आवरण फाटते व आतील काळा भाग उघडा होतो. हा काळा भाग म्हणजे बुरशीचे बीजाणू होत. हे बीजाणू हवेद्वारे विखुरतात व निरोगी उसाचे डोळ्यावर पडतात. त्यावर रोगाचा प्रादुर्भाव होतो. अशा तर्हेने रोग शेतात पसरतो. काणी रोगामुळे उसाची वाढ खुंटते, ऊस बारीक होतो, पाने अरुंद व लहान होतात, त्यामुळे उत्पादनात घट येते.लागवडीच्या उसापेक्षा खोडव्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. या रोगाचा प्रसार बेण्याद्वारे आणि हवेद्वारे होतो.

                🌲🌱🌲🌾🌱🌾🌱🌲🌲
               🌾🤔  [नियंत्रणाचे उपाय ]🤔🌱
                🌱🌲🌱😃🌲🌱🌲🌱🌾
१) रोगग्रस्त उसाचा बेण्यासाठी वापर करू नये. निरोगी बेणे वापरावे.
२) लागवडीच्या उसात काणी रोगाचा प्रादुर्भाव ५ टक्क्यापेक्षा जास्त असेल तर अशा उसाचा खोडवा घेऊ नये.
३)रोग प्रतिकारक वाणांचा वापर करावा.
४) ३ ते ४ वर्षानंतर बेणे बदलावे.
५) शेतात कणीचा पट्टा दिसताच तो प्लॅस्टिकच्या पिशवीत अलग कापून घ्यावा, संपूर्ण बेट मुळासकट उपटून काढावे व जाळून नष्ट करावे.
६) लागवडीपूर्वी उसाचे बेणे १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम व १०० लिटर पाणी या द्रावणात १० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.
७) लागवडीसाठी रोगप्रतिकारक जातीचा वापर करावा. उदा. कोव्हीएसआर-९८०५.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------



            🎋-[2]-  =>गवताळ वाढ. 🎋
                              हा रोग मायाकोप्लाझ्मा नावाच्या विषाणूपासून होतो. याचे प्रमुख लक्षण म्हणजे उसाचे बुंध्याकडील बाजूस असलेल्या डोळ्यातून असंख्य फुटवे येतात व त्याला गवताच्या थेंबाचे स्वरूप येते. फुटवे रंगाने पिवळसर पांढरट असून त्याची पाने अरुंद व लहान असतात. हा रोग बेण्याद्वारे, ऊस कापणीच्या कोयत्याद्वारे आणि मावा किडीद्वारे पसराव होते

            🌾🌲🌳🌱🌾🌲🌳🌲🌾🌱
              🌲🌾      नियंत्रणाचे उपाय. 🌲🌾🌱
                   🌲🌾🌱🌳🌲🌾🌱🌳🌲
१) लागवडीसाठी निरोगी बेण्याचा वापर करावा.
२) उष्णजल किंवा बाष्पउष्ण हवा प्रक्रिया देऊन तयार केलेल्या बेणे मळ्यातील बेणे नवीन लागवडीसाठी वापरावे.
३) रोगट उसाचा खोडवा ठेवू नये.
४) मावा किडीद्वारे या रोगाचा प्रसार होत असल्यामुळे मावा किडीचे किटकनाशकाद्वारे नियंत्रण करावे.
५) गवताळ वाढीचे बेणे मुळासकट काढून नष्ट करावे.
६) बेणे लागवडीपूर्वी ५०० किंवा १००० पीपीएम लिंडरमायसीनमध्ये बुडवून लावावे.
७) लागवडीकरिता रोगप्रतिकारक जातींची निवड करावी.
उदा. कोव्हीएसआर-९८०५, कोव्हीएसआर-४९४.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------


     [3]==> गाभा रंगणे (लाल कांडी. )  🎋
                  गाभा रंगणे हा रोग कोलिटोट्रायकम फालकॅटम या बुरशीचे प्रादुर्भावामुळे होतो. सुरुवातीच्या अवस्थेत हा रोग ओळखता येत नाही, परंतु पावसाळयानंतर जेव्हा उसाची वाढ थांबून साखर तयार होण्याचे प्रक्रियेस सुरुवात होते तेव्हा या रोगाची लक्षणे दिसून येतात. रोगग्रस्त उसाचे शेंड्यापासून तिसरे अथवा चवथे पान निस्तेज पडून वाळते व नंतर पूर्ण शेंडा वाळतो. रोगग्रस्त ऊस लांबीतून उभा कापला असता आतील गाभा लाल झालेला आढळून येतो. त्यात अधून - मधून आडवे पांढरे पट्टे दिसतात. कालांतराने ऊस पोकळ होतो, आकसतो व सालीवर सुरकुत्या पडतात. अशा उसाला अल्कोहोलसारखा वास येतो. या रोगाचा प्रसार बेण्याद्वारे होतो
            🌱🌳🌾🌲🌱🌲🌾🌾🌲
                 *नियंत्रणाचे उपाय-
          🌲🌱🌲🌾🌲🌾🌾🌲🌾
          १) लागवडीसाठी निरोगी बेण्याचा वापर करावा.
२) उष्णजल किंवा बाष्पयुक्त हवा प्रक्रिया देऊन तयार केलेल्या बेणे मळ्यातील बेणे नवीन लागवडीसाठी वापरावे.
३) लागवडीपूर्वी उसाचे बेणे कार्बेन्डिझम १०० ग्रॅम बुरशीनाशक १०० लिटर पाण्यात मिसळून त्या द्रावणात १० ते १५ मिनिटे बुडवून लागवड करावी.
४) ऊस कापण्याचा कोयतासुद्धा निर्जंतूक करून घ्यावा.
५) रोगग्रस्त शेतातील उसाचा कापणी शक्य तेवढ्या लवकर करवी. रोगग्रस्त उसाचा खोडवा घेऊ नये.
६) ऊस कापणीनंतर त्या शेतात नवीन ऊस लागवड करू नये. पिकाची फेरपालट करवी.
७) कापणीनंतर शेतातील पाचाट, वाळा, धसकटे इत्यादी जागेवरच जाळून नष्ट करवीत.
८) उसाला पाणी कमी द्यावे.
९) ज्या भागात रोगाचा प्रादूर्भाव झालेला असेल, तेथे ३ ते ४ वर्षे उसाचे पीक घेऊ नये.
१०) पिकांची फेरपालट करावी.
११) रोगप्रतिकारक जातीची लागवड करावी. उदा. को-७३१४, को-५७६७

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

[4]==>   उसावरील मर* 🎋

हा रोग फ्युजेरियम मोनिलीफॅरमी व सेफॅलोस्पोरीयम सॅफॅरी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव देठ कुजव्या किंवा मुळे पोखरणार्‍या अळीच्या संयोगाने मोठ्या प्रमाणात होतो. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या उसाची पाने पिवळसर व निस्तेज होतात आणि नंतर वळतात . शेवटी प्रादुर्भाव वाढल्यास ऊस पुर्णपणे वाळतो, पोकळ होतो व वजनाला हलका भरतो. मुळ्य कुजतात, ऊस अलगपणे उपटून येतो. ऊस कांड्याचे समान दोन भाग केलेल्या कांड्याचा आतील भाग करड्या रंगाचा व लालसर पडलेला दिसतो आणि बराचसा भाग तंतुमय झालेला दिसतो.

*नियंत्रणाचे उपाय-*
 १) निरोगी बेणे वापरावे.
२) रोगट उसाच खोडवा ठेवू नये.
३) मुळे पोखरणार्‍या किडीचा बंदोबस्त करावा.
४) फेरपालटीची पिके घ्यावीत.
५) प्रादुर्भाव झालेल्या शेतातील बेणे वापरू नये.
६) रोगट उसाचे अवशेष गोळा करून त्यांचा नायनाट करवा.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------


🎋 *पोक्का बोईंग (पोंगा कुजणे)* 🎋

हा रोग फ्युजेरियम मोनिलीफॉरमी या बुरशीपासून होतो. पोक्का बोईंग याचा अर्थ शेंड्याजवळील पानाचा आकार बदलणे किंवा पोंगा कुजणे असा होतो. अलिकडे या रोगाची लागण महाराष्ट्रात दिसून आली आहे. पोक्का बोईंग रोगाची लक्षणे सर्वप्रथम पोंग्याजवळील पानावर दिसतात. सुरुवातीला देठाजवळ पाने पिवळी पडतात. रोगाची तीव्रता वाढल्यास पानावर सुरकुत्या पडतात. पाने अंकुचित होतात आणि शेंडा व पोंगा कुजतो. उसाची वाढ खुंटते, कांड्या आखूड होतात. काही वेळेस फांद्याही फुटातात. उसाची पाने एकमेकात गुंतलेली असतात. या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो.

*नियंत्रणाचे ऊपाय-*
१) २० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा २० ग्रॅम मॅन्कोझेब अथवा १० ग्रॅम कार्बेन्डिझम यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) उसाची लागवड लवकर करावी. उशीरा म्हणजे एप्रिल - मी मध्ये उसाची लागवड करू नये.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

🎋 *पायनापल (अननस रोग)* 🎋

हा बुरशीमुळे होणारा रोग आहे. सेरॅटोसिस्टिम पॅराडॉंक्सा या बुरशीमुले उसावर हा रोग होतो. हा रोग प्रामुख्याने जमिनीद्वारे पसरतो. म्हणून ऊस लागवड झाल्यानंतर याचा प्रादुर्भाव आढळून येतो. क्वचितच जर उंदीरामुळे, किडीमुळे अथवा अवजारामुळे असास इजा झाली असेल तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव उभ्या उसावर दिसून येतो. रोगजंतू इजा झालेल्या भागांवर शिरकाव करून उभ्या उसावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास रोगग्रस्त बेणे उगवत नाही. कारण रोगजंतू कांडीतील अन्नांश स्वत:साठी उपयोगात आणतात. त्यामुळे उगवणीवर विपरीत परिणाम होतो. प्रादुर्भाव झालेल्या ऊसाकांडीचे निरीक्षण केले असता कांडी वजनाला हलकी व करड्या रंगाची होऊन कुजलेल्या अवस्थेत दिसते. कांडीचे उभे दोन भाग केल्यास आतील भाग गडद लाल ते काळ्या रागाचा झालेला दिसतो. आतील तंतुमय भाग मोकळा होऊन कांडी पोकळ होते. कांडीवरील डोळे कुजतात. त्यामुळे उसाची उगवण होन नाही आणि उगवण झाली तर ते रोप जास्त काळ जगत नाही. उगवलेल्या उसात रोगाची तीव्रता वाढल्यास प्रथम पाने वाळतात व नंतर संपूर्ण रोप वळते. रोगट उसाचे कांड्याचा वास अननस फळाच्या वासासारखा येतो. म्हणून याला 'अननस रोग' म्हणतात. हा रोग मुख्यत्वेकरून खोलवर लागण केल्यास किंवा पाण्याचा निचरा होत नसलेल्या जमिनीत ऊस लागण केल्यास आढळतो.

*नियंत्रणाचे उपाय-*
१) निरोगी बेणे वापरावे.
२) लागवडीपूर्वी बेणे १०० ग्रॅम कार्बेन्डिझम बुरशीनाशक अथवा १०० ग्रॅम बेलेटॉंन बुरशीनाशक १०० लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात १० मिनिटे बुडवून लागवड करावी.
३) उसाची खोल लागवड करू नये.
४) जमीन निचरायुक्त असावी.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------


🎋 *केवडा (लोह कमतरता)*  🎋

उसावरील केवडा हा रोग लोह या अन्नद्रव्याचे कमततेमुळे दिसून येतो. गावठाण किंवा पांढरीच्या जमिनीत तसेच पोयट्याच्या जमिनीत याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो. कारण अशा जमिनीत कॅल्शियम व मॅग्नेशियमयुक्त क्षाराचे प्रमाण अधिक असल्यामुळे लोह या अन्नद्रव्याची उपलब्धता कमी असते. त्यामुळे उसावर केवडा रोग दिसून येतो. रोगाचे सुरुवातीला उसाच्या शेंड्याकडील पाने पिवळी पडू लागतात. प्रथम पानाच्या शिराकडील भाग पिवळा पडतो. नंतर शिरांचा हिरवेपणा नष्ट होऊन संपूर्ण पान पिवळे होते. पीक निस्तेज दिसू लागते. प्रादुर्भाव तीव्र स्वरूपाचा असल्याने पाने पूर्णपणे पांढरट होतात आणि केवड्याच्या पानाप्रमाणे दिसू लागतात. रोगग्रस्त उसाची उंची कमी असते. खोडव्यामध्ये सुरूवातीपासून याचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

*नियंत्रणाचे उपाय-*
१) हिरवळीची पिके घ्यावीत.
२) गंधकयुक्त खताचा वापर करवा.
३) चुनखडीयुक्त जमिनीत उसाची लागवड करू नये.
४) हेक्टरी २.५ किलो हिराकस (फेरस सल्फेट) ५०० लिटर पाण्यात मिळसून १० ते १२ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या कराव्यात.
५) हिरवळीची पिके घ्यावीत. गंधकयुक्त खताचा वापर करावा.
६) उसाची लागवड चुनखडीच्या जमिनीत करू नये.
७) हेक्टरी १० किलो हिराकस कम्पोस्ट किंवा शेणखतात मिसळून लागवडीपूर्वी जमिनीत टाकावे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------


🎋 *तांबेरा* 🎋

हा रोग ‘पकसीनिया’ नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाची प्रमुख लक्षणे हिवाळ्यात दिसतात. पानांवर तांबड्या रंगाचे पुरळ दिसतात व त्यातून लालसर धूरिकरण बाहेर पडतात.

*नियंत्रणाचे ऊपाय-*
१) ऊस पिकाला पाणी बेताने द्यावे व या रोगाचा प्रादूर्भाव झालेल्या पिकाचा खोडवा घेऊ नये.
२) या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगप्रतिबंधक जातीची निवड करावी. उदा. को-६३१९८, को-७२१९.

📚 *संकलन -* कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र राज्य

*​​|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||​​*
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
🙏🙏   सदरील लेख व्हॉट्सप वरून कॉपी केला आहे  -🙏🙏