Translate

Friday, February 22, 2019

@ ज्ञानेश्वरी @अध्याय १ला अर्जुनविषादयोगः-ओवी क्र :- ४१ ते ६०

卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💎 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💎
 *अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः*
  🌹 *ओवी क्रमांक :- ४१ ते ५०* 🌹
     

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
🍁 🌟 *~_卐_~* *श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ* *~_卐_~* 🌟🍁


ना तरी नगरांतरीं वसिजे । तरी नागराचि होईजे ।
तैसें व्यासोक्तितेजें । धवळत सकळ ॥ ४१ ॥

कीं प्रथमवयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी ।
प्रगटे जैसी आगळी । अंगनाअंगीं ॥ ४२ ॥

ना तरी उद्यानीं माधवी घडे । तेथ वनशोभेची खाणी उघडे ।
आदिलापासौनि अपाडें । जियापरी ॥ ४३ ॥

नानाघनीभूत सुवर्ण । जैसें न्याहाळितां साधारण ।
मग अलंकारीं बरवेपण । निवाडु दावी ॥ ४४ ॥

तैसें व्यासोक्ति अळंकारिलें । आवडे तें बरवेपण पातलें ।
तें जाणोनि काय आश्रयिलें । इतिहासीं ॥ ४५ ॥

नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरूनि आंगीं ।
पुराणें आख्यानरूपें जगीं । भारता आलीं ॥ ४६ ॥

म्हणौनि महाभारतीं नाहीं । तें नोहेचि लोकीं तिहीं ।
येणें कारणें म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७ ॥

ऐसी जगीं सुरस कथा । जें जन्मभूमि परमार्था ।
मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥ ४८ ॥

जें अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम ।
परम मंगलधाम । अवधारिजो ॥ ४९ ॥

आतां भारतकमळपरागु । गीताख्यु प्रसंगु ।
जो संवादला श्रीरंगु । अर्जुनेंसीं ॥ ५० ॥

      🍁🍁 *मराठी अर्थ*🍁🍁


  *ज्याप्रमाणे*नगरात राहिल्यावर मानवास शहाणपण प्राप्त होते, त्या प्रमाणे व्यासांच्या सात्विक वाणीच्या तेजामुळे सर्व जग ज्ञानसंपन्न झाले. ।।४१।।

  तारुण्यात पदार्पण केल्यानंतर मुलीच्या अंगी सौंदर्याचा नवा बहर आलेला असतो आणि तो स्पष्टपणे दिसू लागतो.  ।।४२।।

  वसंत ऋतूचे आगमन झाले, की बागेतील वनशोभा पूर्वी पेक्षा अधिकच बहरून येते; जणू काही सौंदर्याची खाणच उघडते.  ।।४३।।

  लगडीच्या रुपात सोने पाहीले, तर त्याचे सौंदर्य सर्वसाधारण वाटते; परंतु त्या सोन्याच्या विविध कलाकुसरीचे दागिने बनविले, तर त्या सोन्याचे सौंदर्य विशेष रुपाने खुलून दिसते.  ।।४४।।

  महर्षी व्यासांच्या तेजस्वी बुद्धीतून प्रगटलेल्या विषयामध्ये सत्य, शिव आणि सुंदरतेचे दर्शन होते, हे पाहून जगातील अनेक इतिहासकारांनी महाभारताचा आश्रय केला आहे.  ।।४५।।

  आपणास मोठी प्रतिष्ठा लाभावी म्हणून स्वतःच्या अंगी नम्रता धरून सर्व पुराणे आख्यानरुपाने महाभारतात येऊन जगामध्ये प्रसिद्ध पावली.  ।।४६।।

  म्हणूनच महाभारतामध्ये जे नाही, ते तिन्ही लोकांमध्ये नाही. महर्षी व्यासांच्या नंतर त्रैलोक्यात जे भाष्यकार झाले, त्यांनी महाभारतातील सिद्धांताचा अभ्यास केला. 'व्यासोंच्छिष्ट जगतत्रय' असे म्हणतात.  ।।४७।।

  अशी ही जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली आणि परमार्थाची जन्मभूमी असलेली महाभारताची कथा आहे. ही कथा जनमेजय राजाला वैंशपायन ऋषींनी सांगितली.।।४८।।

  श्रोते हो ! ही कथा एकाग्रतेने श्रवण करा. हे महाभारत अद्वितीय,उत्तम,अतिपवित्र निरुपम आणि सर्व मांगल्याचे परम स्थान आहे.  ।।४९।।

  महाभारत हे जणू काही कमळ असून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास सुखसंवादाच्या रुपाने सांगितलेली गीता जणू काही त्यातील सुगंधी पराग आहे.  ।।५०।।


*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*"वसुदेव सुतं देवं कंस चाणुर मर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगदगुरुम्।।"*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢

     💠🌹 *राम कृष्ण हरी* 🌹 💠

🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💎 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💎
 *अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः*
  🌹 *ओवी क्रमांक :- ५१ ते ६०* 🌹
   

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
🍁 🌟 *~_卐_~* *श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ* *~_卐_~* 🌟🍁


*ना तरी शदब्रह्माब्धि । मथियला व्यासबुद्धि ।*
*निवडिलें निरवधि । नवनीत हें ॥ ५१ ॥*

मग ज्ञानाग्निसंपर्कें । कडसिलेंनि विवेकें ।
पद आलें परिपाकें । आमोदासी ॥ ५२ ॥

जें अपेक्षिजे विरक्तीं । सदा अनुभविजे संतीं ।
सोहंभावें पारंगतीं । रमिजे जेथ ॥ ५३ ॥

जें आकर्णिजें भक्तीं । जें आदिवंद्य त्रिजगतीं ।
तें भीष्मपर्वीं संगती । म्हणितली कथा ॥ ५४ ॥

जें भगवद्गीता म्हणिजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे ।
जें सनकादिकीं सेविजे । आदरेंसीं ॥ ५५ ॥

जैसें शारदीचिये चंद्रकळे । माजि अमृतकण कोंवळे ।
ते वेंचिती मनें मवाळें । चकोरतलगें ॥ ५६ ॥

तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा ।
अतिहळुवारपण चित्ता । आणूनियां ॥ ५७ ॥

हें शब्देंवीण संवादिजे । इंद्रियां नेणतां भोगिजे ।
बोलाआधि झोंबिजे । प्रमेयासी ॥ ५८ ॥

जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळें नेणती ।
तैसी परी आहे सेविती । ग्रंथीं इये ॥ ५९ ॥

कां आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंद्रु प्रकटतां ।
हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ॥ ६० ॥
     
       🍁 *मराठी अर्थ*🍁

     महर्षी व्यासांनी आपल्या प्रखर बुध्दीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून महाभारतरूपी अनुपमेय नवनीत काढले.  ।।५१।।

  मग ते नवनीत ज्ञानरुप अग्नीच्या संबंधाने विवेकपूर्वक घडविले; आणि त्याचा उत्तम परिपाक होऊन त्या लोण्याचे सुगंधी साजूक तूप झाले, ते म्हणजे *गीता* होय. ।।५२।।

  वैराग्यवान देखील या गीतेची इच्छा करतात. संतदेखील नेहमी या गीतेचा अनुभव घेतात. *'तो परमात्मा मी आहे'* अशा अभेद भावात असणारे ब्रम्हनिष्टदेखील या गीतेत रममाण होतात.  ।।५३।।

  भक्त जिचे परम श्रद्धेने श्रवण करतात, जी त्रैलोक्यात प्रथम वंदनीय आहे, जी भीष्मपर्वात प्रसंगाच्या अनुरोधाने सांगितली आहे.  ।।५४।।

  ती " *भगवतगीता*" होय. ब्रम्हदेव आणि महादेव तिची स्तुती करतात, सनकादिक परम श्रद्धेने तिचे श्रवण, मनन, पठण करतात. ।।५५।।

  शरद ऋतूतील चंद्रकलेत असलेले कोवळे अमृतकण चकोर पक्षांची पिल्ले जसे अतिशय मृदू मनाने वेचतात.  ।।५६।।

  त्या प्रमाणे श्रोत्यांने चित्त शुद्ध करून एकाग्रतेने, अत्यन्त हळुवार पणे *भगवदगीतेचा*अनुभव घ्यावा.  ।।५७।।

 शब्दांशिवाय या गीतेच्या अर्थाची मनातल्या मनात चर्चा करावी. इंद्रियांना नकळत याच्या अर्थाचा अनुभव घ्यावा. वक्ताच्या मुखातून शब्द प्रकट होण्यापूर्वीच त्यातील सिद्धांताशी एकरूप होऊन राहावे. ।।५८।।

  ज्या प्रमाणे भ्रमर कमलदलाला समजू न देता त्यातील पराग सेवन करतात, त्याप्रमाणे हा ग्रंथ जाणून घेण्याची पद्धत आहे.  ।।५९।।

  नभामध्ये चंद्रमा उदय पावला, की चंद्रविकासी कुमुदनी प्रफुल्ल होतात आणि आपले पाण्यातील स्थान न सोडता त्याला अलिंगन देण्याचे परमसुख जाणतात. ।।६०।।

*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*"वसुदेव सुतं देवं कंस चाणुर मर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगदगुरुम्।।"*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢

     💠🌹 *राम कृष्ण हरी* 🌹 💠

🔺🔅🔺🔅🔺🔅🔺🔅🔺🔅🔺

卐ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका卐=अध्याय १ला :- अर्जुनविषादयोगः-ओवी क्रं-२१ ते ४०

     卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💎 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💎
 *अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः*
  🌹 *ओवी क्रमांक :- २१ ते ३०* 🌹
       

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
🍁 🌟 *~_卐_~* *श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ* *~_卐_~* 🌟🍁

*आतां अभिनव वाग्विलासिनी । ते चातुर्यार्थकलाकामिनी* ।
ते शारदा विश्वमोहिनी । नमिली मियां ॥ २१ ॥

मज हृदयीं सद्‍गुरु । जेणें तारिलों हा संसारपूरु ।
म्हणौनि विशेषें अत्यादरु । विवेकावरी ॥ २२ ॥

जैसें डोळ्यां अंजन भेटे । ते वेळीं दृष्टीसी फांटा फुटे ।
मग वास पाहिजे तेथ । प्रगटे महानिधी ॥ २३ ॥

कां चिंतामणी जालियां हातीं । सदा विजयवृत्ति मनोरथीं ।
तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ति । ज्ञानदेवो म्हणे ॥ २४ ॥

म्हणोनि जाणतेनें गुरु भजिजे । तेणें कृतकार्य होईजे ।
जैसें मुळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ॥ २५ ॥

कां तीर्थें जियें त्रिभुवनीं । तियें घडती समुद्रावगाहनीं ।
ना तरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ॥ २६ ॥

तैसा पुढतपुढती तोचि । मियां अभिवंदिला श्रीगुरुचि ।
जो अभिलषित मनोरुचि । पुरविता तो ॥ २७ ॥

आतां अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुकां जन्मस्थान ।
कीं अभिनव उद्यान । विवेकतरूचें ॥ २८ ॥

ना तरी सर्व सुखाचि आदि । जे प्रमेयमहानिधि ।
नाना नवरससुधाब्धि । परिपुर्ण हे ॥ २९ ॥

कीं परमधाम प्रकट । सर्व विद्यांचे मूळपीठ ।
शास्त्रजाता वसौट । अशेषांचें ॥ ३० ॥

   🌹 *मराठी अर्थ*🌹

  *(सरस्वती-वंदन)* या नंतर नित्यनूतन प्रतिभा आणि वाणीच्या रुपाने क्रीडा करणारे चातुर्य, अर्थ व कला यांची कामिनी, विविध रस आणि अलंकार युक्त मधुर भाषेद्वारा संपूर्ण विश्वाला मोहित करणारी अशी जी शारदा, तिला मी विनम्र भावाने नमस्कार करतो.  ।।२१।।

  *(सद्गुरु-स्तवन)* श्री सद्गुरूंनी सांगितलेले ज्ञान मी माझ्या हृदयामध्ये साठविले ; त्या मुळे मला भवसागर तरुण जाता आला. म्हणून अंतःकरणातील विवेकावर माझे आत्यंतिक प्रेम आहे.  ।।२२।।

  *ज्या प्रमाणे* पायाळू माणसाच्या डोळ्यात अंजन घातले असता त्याची दृष्टी सर्वत्र पसरते आणि त्याला भूमीमध्ये असणाऱ्या संपत्तीचा ठसा दिसू लागतो.  ।।२३।।

  *मनोकामना* पूर्ण करणारा चिंतामणी हाती आला असता सर्व हेतू पूर्ण होतात, त्या प्रमाणे सद्गुरु निवृत्तीनाथांच्या मूळे मी पूर्णकाम झालो आहे. माझ्या सर्व सदिच्छा पूर्ण झाल्या आहेत, असे ज्ञानदेव म्हणतात.  ।।२४।।

  *या साठी* जाणकारांनी सद्गुरुवर परम श्रद्धा ठेवून आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावे, म्हणजे जीवन कृतकृत्य होईल. जसे, झाडाच्या मुळाला पाणी घातले असता फांद्या व पाने सहजच विकसित होतात.  ।।२५।।

  *एका समुद्र* स्नानामुळे त्रैलोक्यांत जेवढी तीर्थे आहेत, त्या सर्वांचे स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते ; किंवा एका अमृत रसाच्या सेवनाने जगातील सर्व रस सेवन केल्या प्रमाणे होते.  ।।२६।।

  *तसे एका सद्गुरूंना* वंदन केले असता, सर्वांना वंदन केल्याचे पुण्य प्राप्त होते ; म्हणून मी वारंवार सद्गुरूंना वंदन करतो, जे सद्गुरु मनातील सर्व सदिच्छा पूर्ण करतात.  ।।२७।।

  *आता सखोल* विचारांची कथा श्रवण करा. ही कथा सर्वांच्या मनात कौतुक उत्पन्न करणारी आहे अथवा विवेकरूपी वृक्षाचे नाविन्यपूर्ण उद्यान आहे.  ।।२८।।

  *ही महाभारतातील* गीता रुपी कथा सर्व मूळ कारण आहे. हे सर्व प्रमुख सिद्धांताचे भांडार आहे किंवा नवरसांनी परिपूर्ण भरलेला अमृताचा सागर आहे.  ।।२९।।

  *किंवा महाभारताच्या* रुपाने मोक्षच प्रगटलेला आहे. हे सर्व विद्यांचे मूळपीठ आहे. जगातील सर्व ज्ञानाचे आश्रयस्थान आहे.  ।।३०।।


*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*"वासुदेव सुतं देवम् कंस चानुर मर्दनम् देवकी परमानंदम् कृष्णम् वंदे जगदगुरुम्।।"*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢

     💠🌹 *राम कृष्ण हरी* 🌹 💠


🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💎 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💎
 *अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः*
  🌹 *ओवी क्रमांक :- ३१ ते ४०* 🌹

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
🍁 🌟 *~_卐_~* *श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ* *~_卐_~* 🌟🍁

  🍁 *श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ* 🍁

 *ना तरी सकळ धर्मांचें माहेर । सज्जनांचे जिव्हार* ।
लावण्यरत्‍नभांडार । शारदेचें ॥ ३१ ॥

   नाना कथारूपें भारती । प्रकटली असे त्रिजगतीं ।
आविष्करोनि महामतीं । व्यासाचिये ॥ ३२ ॥

म्हणौनि हा काव्यांरावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो ।
एथूनि रसां झाला आवो । रसाळपणाचा ॥ ३३ ॥

तेवींचि आइका आणिक एक । एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक ।
आणि महाबोधीं कोंवळीक । दुणावली ॥ ३४ ॥

एथ चातुर्य शहाणें झालें । प्रमेय रुचीस आलें ।
आणि सौभाग्य पोखलें । सुखाचें एथ ॥ ३५॥

माधुर्यीं मधुरता । श्रुंगारीं सुरेखता ।
रूढपण उचितां । दिसे भलें ॥ ३६ ॥

एथ कळाविदपण कळा । पुण्यासि प्रतापु आगळा ।
म्हणौनि जनमेजयाचे अवलीळा । दोष हरले ॥ ३७ ॥

आणि पाहतां नावेक । रंगीं सुरंगतेची आगळीक ।
गुणां सगुणपणाचें बिक । बहुवस एथ ॥ ३८ ॥

भानुचेनि तेजें धवळलें । जैसे त्रैलोक्य दिसे उजळिलें ।
तैसें व्यासमति कवळिलें । मिरवे विश्व ॥ ३९ ।।

कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें ।
तैसें भारतीं सुरवाडलें । अर्थजात ॥ ४० ॥

         🍁 *मराठीत अर्थ* 🍁

*श्री ज्ञानदेव माउली ३१व्या ओवी च्या प्रारंभी म्हणतात*
  *महाभारत* हे सर्व धर्माचे माहेर आहे, सज्जनांच्या जिव्हाळ्याचा, आनंदाचा विषय आहे; आणि सरस्वतीच्या सौंदर्यरूपी रत्नांचे भांडार आहे. ।।३१।।

  *सरस्वती* महर्षी व्यासांच्या विशाल बुद्धीत प्रगट होऊन विविध कथेच्या त्रैलोक्यात प्रसारित झाली. ।।३२।।

  *हा महाभारत* ग्रंथ सर्व काव्यग्रंथाचा राजा आहे. या ग्रंथाच्या ठिकाणी महानतेची परिसीमा झाली आहे. या ग्रंथा पासून काव्यातील रसांना रसाळपणाचा डौल आला आहे. ।।३३।।

  *तसेच,* या ग्रंथाचे आणखी महत्व श्रवण करा. महाभारतापासून शब्दरूप संपत्तीला शास्त्रीयता प्राप्त झाली आणि ब्रम्हज्ञानाच्या ठिकाणी कोवळिकता अधिकच वाढली. ।।३४।।

  *या महाभारतात* चातुर्य शहाणे झाले, सिद्धांताना अमृतमय गोडी प्राप्त झाली आणि सुखाचे ऐश्वर्य अधिकच पुष्ट झाले.  ।।३५।।

   *माधुर्याला* मधुरता, शृंगाराला सुरेखपणा आणि योग्य वस्तुंना श्रेष्ठपणा येऊन त्या सर्व उत्तम रीतीने शोभून दिसू लागल्या.  ।।३६।।

  *यातील* कथेपासून कलांना विशेष कौशल्य प्राप्त झाले. पुण्याचा प्रताप वाढू लागला. महाभारताच्या श्रावणाने जनमेजयाचे ब्रम्हहत्येचे दोष नाहीसे झाले.  ।।३७।।

  *सुक्षमबुद्धीने* महाभारताचे निरीक्षण केले असता असे दिसून येते की, विविध कलांतील गुण त्याने वाढले. या कथेमुळे सद्गुणांचें सामर्थ्य प्रगट झाले.  ।।३८।।

  *सूर्याच्या* तेजाने त्रैलोक्य जसे उजळून निघते, त्या प्रमाणे महर्षी व्यासांच्या विशाल बुद्धीतून निर्माण झालेल्या या कथेमुळे सर्व जगावर ज्ञानाचा प्रकाश पसरला आणि ते शोभून दिसू लागले.  ।।३९।।

  *उत्तम* जमिनीत बी पेरले असता जसा त्याचा सहज विस्तार होत जातो, त्या प्रमाणे महाभारतात सर्व विषय शोभायमान झाले आहेत. ।।४०।।

*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*"वासुदेव सुतं देवम् कंस चानुर मर्दनम् देवकी परमानंदम् कृष्णम् वंदे जगदगुरुम्।।"*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢

     💠🌹 *राम कृष्ण हरी* 🌹 💠

🔺🔅🔺🔅🔺🔅🔺🔅🔺🔅🔺

ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका 卐अध्याय १ला :- अर्जुनविषादयोगः=ओवी क्र :- ०१ ते २०

*卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💠 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💠
🙏अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः-(ओवी क्रमांक :- ०१ ते १०)
       


👏हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे👏

        卐-श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ-卐

ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या*।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा* ॥ १ ॥

देवा तूंचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु ।
म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥ २ ॥

हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।
जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥ ३ ॥

स्मृति तेचि अवयव । देखा आंगीक भाव ।
तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥ ४ ॥

अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें ।
पदपद्धति खेवणें । प्रमेयरत्‍नांचीं ॥ ५ ॥

पदबंध नागर । तेंचि रंगाथिले अंबर ।
जेथ साहित्य वाणें सपूर । उजाळाचें ॥ ६ ॥

देखा काव्य नाटका । जे निर्धारितां सकौतुका ।
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि ॥ ७ ॥

नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी ।
दिसती उचित पदें माझारीं । रत्‍नें भलीं ॥ ८ ॥

तेथ व्यासादिकांच्या मतीं । तेचि मेखळा मिरवती ।
चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ॥ ९ ॥

*देखा षड्दर्शनें म्हणिपती । तेची भुजांची आकृति* ।
*म्हणौनि विसंवादे धरिती । आयुधें हातीं ॥ १० ॥*



     🍁    मराठीत अर्थ   🍁

*(आत्मरूप-वंदन)*अनादीसिद्ध वेदांनी वर्णन केलेल्या , ज्याच्या त्याच्या स्वतः प्रत्येयास येणाऱ्या , विश्वस्वरूप निर्गुण आत्मरूपा , तुझा जयजयकार करून तुला नमस्कार करत आहे .।।1।।

   *(ओंकार रूप गणेश वंदन)* हे देवा ! सर्व विश्वाच्या बुद्धीला प्रकाश देणारा जो गणेश , तो तूच आहेस . निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात , तो गणेश कसा आहे ते अवधानपूर्वक ऐक. ।।2।।

  *संपूर्ण* वेद हीच जणू काही पोषाख केलेली  गणेशाची मूर्ती होय आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी शरीराचे सौंदर्य शोभून दिसते आहे.।।3।।

  *मन्वादिकांच्या* स्मुर्ती हे त्याचे अवयव आहते. ते अवयव या स्मुर्तीतील अर्थ-सौंदर्याने जणू लावण्याची केवळ खाणच बनले आहेत. ।।4।।

  *अठरा* पुराणे हे गणपतीच्या अंगावरील रत्नखचित अलंकार आहेत . त्यामध्ये सांगितलेली ही रत्ने; आणि शब्दांची छंदयुक्त रचना ही त्यांची कोंदणे आहेत ।।5।।

  *लालित्यपूर्ण* पदरचना हेच उत्कृष्ट रंगाने रंगविलेले वस्त्र आहे. शब्द-अलंकार आणि अर्थ-अलंकार हे त्या वस्रवरील तेज:पुंज दिसणारे जरीचे तलम तंतू आहेत.।।6।।

  *काव्य* आणि नाटक यांचा कौतुकाने विचार केला आसता, त्या गणपतीच्या पायातील रूणझुंणाऱ्या छोट्या-छोटया घागऱ्या आहेत अर्थ हा त्या घागऱ्यांना  बसविलेल्या घुंगराचा मंजूळ असा ध्वनी आहे.।।7।।

  *व्यास*,वाल्मिकी ,भरतमुनी यांच्या काव्य नाटकातील विविध सिद्धांताच्या शब्दांचा एकाग्रतेने अभ्यास केला , तर त्यात कवीचे अलौकिक कौशल्य दिसून येते . अशी ही  अनमोल शब्द-घागऱ्यांतील उत्तमोत्तम रत्ने आहेत ।।8।।

  *महर्षी* व्यासादिकांची बुद्धी ही गणपतीची मेखला म्हणजे कटिभूषण होय. त्याला लोंबत असलेल्या मोत्यांच्या पदरातील घोष हे त्या बुद्धीतील शुद्धत्व सात्विकपणे झळकत आहे.।।9।।

  *गणपतीचे* सहा हात ही सहा शास्त्रे होत ; म्हणून त्यांतील विविध प्रकारचा अभिप्राय ही त्या त्या हातातील वेगवेगळी शस्त्रे होत.।।10।।


*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

*卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💠 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💠
💢 *अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः* 💢
  🌹 *ओवी क्रमांक :- ११ ते २०* 🌹
     
*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे

卐-श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ-卐

तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु ।
वेदांतु तो महारसु । मोदकु मिरवे ॥ ११ ॥

एके हातीं दंतु । जो स्वभावता खंडितु ।
तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ॥ १२ ॥

मग सहजें सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु ।
धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ॥ १३ ॥

देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु ।
जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥ १४ ॥

 तरी संवादु तोचि दशनु । जो समता शुभ्रवर्णु ।
देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥ १५ ॥

मज अवगमलिया दोनी । मिमांसा श्रवणस्थानीं ।
बोधमदामृत मुनी । अली सेविती ॥ १६ ॥

प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ ।
सरिसेपणें एकवटत इभ- । मस्तकावरी ॥ १७ ॥

उपरि दशोपनिषदें । जियें उदारें ज्ञानमकरंदे ।
तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें । शोभती भलीं ॥ १८ ॥

अकार चरण युगल । उकार उदर विशाल ।
मकार महामंडल । मस्तकाकारें ॥ १९ ॥

हे तीन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें ।
तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें । आदिबीज ॥ २० ॥


🌺🌹 *मराठी अर्थ*  🌹🌺

  *न्याय* दर्शनातील सोळा पदार्थांचे विश्लेषण करणारा तर्क म्हणजे गणपतीच्या हातातील परशू होय. वैशेषिक दर्शनातील सात पदार्थांचा सिद्धांतभेद हा दुसऱ्या हातातील अंकुश आहे आणि उत्तरमीमांसा दर्शनातील ब्रम्हस्वरूप सिद्धांत हा गणपतीच्या हातातील अमृतमधुर मोदक होय.   ।।११।।

  *वार्तिककरांनी* सांगितलेले आणि स्वभावतःच खंडीत झालेले जी बौद्ध मत आहे, ते एका हातात असणाऱ्या खंडित दाताच्या ठिकाणी शोभते.  ।।१२।।

  *सत्कारवाद* हा गणपतीचा वर देणारा कामलासमान हात होय. हा धर्माची सिद्धी करतो आणि हा अभय देणारा हात आहे.  ।।१३।।

  *गणपतीच्या* ठिकाणी ब्रम्हानंद ही सरळ, निर्मळ आणि चांगले व वाईट याची निवड करण्यास समर्थ अशी सोंड आहे.  ।।१४।।

  *गुरू-शिष्याचा* हा सुखसवांद म्हणजे गणपतीच्या मुखतील दात असून ब्रम्हज्ञान प्राप्त झाल्यानंतर सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी निर्माण होणारी समता हा त्या दातांचा पांढरा रंग होय. ज्ञानदृष्टी म्हणजे त्या विघ्नराजाचे सूक्ष्म असे नेत्र होत.  ।।१५।।

  *पूर्वमीमांसा* आणि उत्तरमीमांसा हाच त्या गणपतीच्या कानांच्या ठिकाणी असून बोध हे त्याचे मदरूपी अमृत मुनिरूपी भ्रमर सेवन करतात, असे मला वाटते.  ।।१६।।

  *वेदशास्त्र* पुराणात सिद्धांतरुपाने संगतलेली तत्वे ही गणपतीच्या अंगावरील तेजयुक्त पोवळी होत. द्वैत आणि अद्वैत मते ही मस्तकावरील गंडस्थळे असून सारखे पणाने ती तेथे एकत्र झाली आहेत.  ।।१७।।

  *ज्ञानरूपी* मकरंद ज्या मध्ये परिपूर्ण भरलेला आहे, अशी ईशावास्य इत्यादी दहा उपनिषदे ही जणू सुगंधी फुले असून ती गणपतीच्या मुकुटावर उत्तम तऱ्हेने शोभून दिसत आहेत.  ।।१८।।

  *ओंकाराची* पहिली अकारमात्रा हे गणपतीचे दोन्ही पाय आहेत. दुसरी उकरमात्रा हे त्याचे मोठे पोट आहे. तिसरीमात्रा हा त्याचा मोठ्या वाटोळ्या मस्तकाच्या आकार आहे.  ।।१९।।

  *अकार, उकार, मकार* या तिन्ही मात्रा एकत्रित झाल्या, म्हणजे त्या ओंकारात संपूर्ण वेद संक्षेपाने समाविष्ट होत असतो. त्या बिजरूप ओंकाररूप गणपती देवरायास मी सद्गुरु श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपेने नमस्कार करतो.  ।।२०।।



*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
*"वासुदेव सुतं देवम् कंस चानुर मर्दनम् देवकी परमानंदम् कृष्णम् वंदे जगदगुरुम्।।"*


     🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏